Jalna News: अनोखी लव्हस्टोरी! 1300 किमीचं अंतर अन् झारखंड कॅडरचा त्याग; जालन्यात एकत्र आली ही पॉवरफुल IAS जोडी

Jalna News: 2022 बॅचचे आयएएस अधिकारी अंजली शर्मा आणि कृष्णकांत कांवरिया या पती-पत्नीची जालना जिल्ह्यात एकत्र बदली झाली आहे. 1300 किमीचे अंतर पार करत प्रेमासाठी झारखंड कॅडर सोडून महाराष्ट्रात आलेल्या या जोडीची प्रेरणादायी यशोगाथा आणि लव्हस्टोरी वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Jalna News: पत्नी महापालिका आयुक्त, तर पती जिल्हा परिषदेचे CEO"

IAS Couple Love Story: आधी 1300 किलोमीटरचे अंतर आणि वेगवेगळे सर्व्हिस कॅडर... पण प्रेमाखातर हे दोघेही आता एकाच जिल्ह्यात एकत्र आले आहेत. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात आयएएस (IAS) पती-पत्नी अंजली शर्मा आणि कृष्णकांत कांवरिया यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील या चर्चित जोडीच्या हातात आता जालना शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांच्या विकासाची सूत्रे आहेत. केवळ त्यांची पोस्टिंगच नव्हे तर त्यांचे यूपीएससीमधील यश आणि लव्हस्टोरी देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पत्नी आयुक्त, पती CEO; जालन्यात महत्त्वाची जबाबदारी

2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये 2022 बॅचच्या आयएएस अंजली शर्मा आणि त्यांचे पती IAS कृष्णकांत कांवरिया यांची जालना जिल्ह्यात एकाच वेळी नियुक्ती करण्यात आली आहे. अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिका आयुक्त म्हणून, तर कृष्णकांत कांवरिया यांची जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारे पत्नी शहराच्या, तर पती गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

Advertisement

IAS सक्सेस स्टोरी: एकत्र क्रॅक केली UPSC

आयएएस कृष्णकांत कांवरिया आणि अंजली शर्मा हे एकाच बॅचचे अधिकारी आहेत. संघ लोक सेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 या दोघांनीही एकत्र उत्तीर्ण केली. कृष्णकांत यांनी चौथ्या प्रयत्नात 382वा रँक मिळवला, तर अंजली यांनी पहिल्याच प्रयत्नात 450वा रँक मिळवून यश संपादन केले. जालन्यापूर्वी अंजली यांनी नंदुरबार उपविभागात सहायक जिल्हाधिकारी म्हणूनही सेवा दिली आहे.

(नक्की वाचा: Success Story: कृषी सेवक ते सहाय्यक आयुक्त.. अकोल्याच्या लेकीची यशस्वी झेप; संघर्षातून मिळवलं यश!)

राजस्थान आणि बिहारशी जोडलेली नाळ

आयएएस अधिकारी कृष्णकांत कांवरिया हे मूळचे राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील कुचामन शहराचे रहिवासी आहेत. तर अंजली शर्मा या मूळच्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोरवा प्रखंडातील सारंगपूर पश्चिम पंचायत येथील आहेत. यूपीएससीपूर्वी अंजली यांनी बीपीएससी  (BPSC) उत्तीर्ण करून आरडीओ (RDO) म्हणूनही काम केले आहे.

(नक्की वाचा: Nagpur News: नागपूरच्या दिव्यांग ईश्वरीने रचला जागतिक विक्रम; 11 तास 15 मिनिटांचा संघर्ष, जेलीफिशचा दंश अन् रौद्र समुद्र)

IAS लव्हस्टोरी: प्रेमासाठी सोडलं झारखंड कॅडर

यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मसुरी येथील 'लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी' (LBSNAA) मध्ये झाले. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. कृष्णकांत यांना झारखंड आणि अंजली यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले होते. झारखंड आणि महाराष्ट्र यामधील अंतर सुमारे 1300 किलोमीटर आहे. लग्नानंतर जानेवारी वर्ष 2026 मध्ये कृष्णकांत कांवरिया झारखंडहून महाराष्ट्र कॅडरमध्ये बदली करून आले, जेणेकरून दोघेही एकत्र राहू शकतील. आता ही आयएएस जोडी जालना जिल्ह्यात एकत्र येऊन विकासाची जबाबदारी सांभाळत आहे.

Advertisement