
Uddhav Raj alliance latest news : राज्यात सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक ही यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रम गुरुवारी (19 जून) झाला. या कार्यक्रमातील भाषणात उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. पण, ठाकरेंनी कोणतीही ठोस घोषणा केली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसे की मविआ? ठाकरे काय करणार?
राज्यातील 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. या आघाडीला (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट) लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. पण, विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला. या पराभवानंतर महाविकास आघाडी एकत्र आहे की नाही? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ही आघाडी कायम राहणार का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मविआच्या भवितव्य अनिश्चित आहे. त्याचवेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही मनसेशी युतीबाबत ते सकारात्मक होते. आज (शुक्रवार 20 जून) सेना भवनमध्ये ठाकरे हटाची बैठक झाली. या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी युतीबाबत सकारात्मकता दाखवली. पण, त्याचबरोबर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आदेशही दिले.
( नक्की वाचा : Thackeray vs Shinde : 'कम ऑन किल मी' ठाकरे आणि शिंदेंचा मेळाव्यात गाजला नानाचा डायलॉग, नेमकं काय घडलं? )
ठाकरेंचा आदेश काय?
युती महाविकास आघाडीशी करायची की मनसे सोबत करायची हे स्थानिक पातळीवर नेत्यांनी ठरवायचं आहे. स्थानिकांनी ठरवून एका महिन्यात अहवाल द्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी कुणासोबत युती करणे फायदेशीर आहे याचा स्थानिक पातळीवर आढावा घ्यावा. त्यानंतर त्याबाबत एका महिन्याच्या आत कळवण्याचे आदेश, ठाकरे यांनी दिले आहेत.
मनसेचा सवाल?
एकीकडे मनसे आणि शिवसेनेची युती सुरु असताना नेत्यांची वेगळवेगळी मत समोर येतं आहेत. 'आता उद्धव ठाकरेंना उत्साह कसा आला ? 2019 ला जर हा सर्व्हे केला असता तर आज शिवसेना फुटली नसती.... 2014 आणि 2017 साली जेव्हा आम्ही एक पाऊल पुढे घेतलं तेव्हा का युती सुचली नाही? असा सवाल मनसे नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंच्या दिलजमाईचा मार्ग अजूनही सोपा नाही, असंच मत व्यक्त केलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world