Nagpur News : पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. कारण विदर्भात कित्येक गावांमध्ये बोगस आणि प्रतिबंधित बियाण्याची घरपोच विक्री सुरू असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. हा आरोप स्वतः परवानाधारक बियाणे विक्रेत्यांनी NDTV मराठी सोबत बोलताना केला आहे.
कृषी खात्याकडे कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या कारवाईला मर्यादा पडतात. मात्र, त्याचमुळे बोगस आणि अवैध बियाणे विक्रीत यावर्षी इतकी वाढ झाली आहे की आमची वैध आणि अस्सल बियाण्याची विक्री अर्ध्यावर आली असल्याचा दावा बियाणे विक्रेत्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा )
त्यामुळे आता राज्य सरकारने यावर तत्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहन नागपूर जिल्हा अॅग्रो डिलर्स असोसिएशनकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )
प्रतिबंधित असलेल्या HTBT बियाणे देखील कमी दरात घरपोच पोहोचवली जात आहे. त्यामुळे अस्सल आणि वैध बियाण्याची विक्री थंडावली आहे. सरकारने बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्रीच्या मुळाशी जावे, असं आवाहन अॅग्रो डिलर्स असोसिएशनने सरकारला केले आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात येथून येणाऱ्या अवैध, बोगस आणि प्रतिबंधित बियाण्यांवर बंदी घालण्याची मागणी डिसर्स असोसिएशनने केली आहे.