
Pandharpur Wari 2025 : वारीचे शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले असून लवकरच वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे. गेल्या १२ ते १३ दिवसांपासून वारकरी विठ्ठलाच्या जयघोष करीत चालत आहेत. ऊन-पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी चालत आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या डोळ्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
इंदापूरकरांचा निरोप घेतल्यानंतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यानं सराटीच्या दिशेने प्रस्थान ठेवलं आहे. पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील सराटेमध्ये होणार आहे. वडापुरी, सुरवड, वकिलवस्ती आणि बावडा या गावांमधून विसावा घेत पालखी सोहळा संध्याकाळपर्यंत सराटी येथे दाखल होणार आहे. दुसरीकडे संत ज्ञानेश्वरांचा पालखी (Saint Dnyaneshwar Maharaj) सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. ही पालखी आज बरड येथून प्रस्थान करेल आणि नातेपुते येथे मुक्कामी असेल. 30 जून रोजी माऊली तर 1 जुलै रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन होईल. माळशिरस तालुक्यात या पालख्यांचा मुक्काम असणार आहे.
नक्की वाचा - Pandharpur Wari Palkhi 2025 : माऊलींची पालखी म्हणजे भक्ती, समता आणि एकात्मतेचा लोकोत्सव; आजचा मुक्काम कुठे असेल?
दरम्यान संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या माळशिरस तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात. लाखो वारकरी या पालखीमध्ये सामील झालेले असतात. माळशिरस पंचायत समिती दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये पाच रिंगण होत असतात. याठिकाणी वारकऱ्यांना स्वच्छतागृह, शौचालय, स्नानगृह, निवाऱ्याची सोय, हिरकणी कक्ष, स्वच्छ पिण्याचे पाणी, फूट मसाज आदी सुविधा माळशिरस पंचायत समितीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी तब्बल दोन लाख चौरस फुटाचे वारकरी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world