Water Crises : राज्यात पाणीटंचाई वाढली; 16 जिल्ह्यांत अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा

Water Shortage : उन्हाचा पारा वाढत असल्याने अनेक छोटे-मोठे तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचे पाणी देखील अटले आहे

जाहिरात
Read Time: 2 mins

Water Shortage News : राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावागावात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या आठवड्यात हा आकडा 223 होता. मात्र आठवड्याभरात 250 पेक्षा अधिक टँकर वाढले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने अनेक छोटे-मोठे तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचे पाणी देखील अटले आहे. त्यामुळे अनेक भागात पिण्यासाठी पाणीच नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

( नक्की वाचा :  ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव )

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर?

  • ठाणे - 36 टँकर
  • रायगड - 21 टँकर
  • पालघर - 17 टँकर
  • नाशिक - 22 टँकर
  • अहिल्यानगर - 56 टँकर
  • पुणे - 31 टँकर
  • सातारा - 55 टँकर
  • सांगली - 02 टँकर
  • सोलापूर - 05 टँकर
  • छत्रपती संभाजीनगर - 135 टँकर
  • जालना - 46 टँकर
  • नांदेड - 02 टँकर
  • अमरावती - 12 टँकर
  • वाशीम - 01
  • बुलढाणा - 28 टँकर
  • यवतमाळ - 08 टँकर
Topics mentioned in this article