जाहिरात

IND Vs ENG: पाच तडाखेबंद शतके तरी युवा शिलेदार फेल! टीम इंडियाच्या पराभवाची कारणे

Reasons why India missed a golden chance to win Leeds Test: दुसऱ्या डावात केएल राहुलने शानदार शतक झळकावले आणि ऋषभ पंतनेही शतक झळकावून इतिहास रचला.

IND Vs ENG: पाच तडाखेबंद शतके तरी युवा शिलेदार फेल! टीम इंडियाच्या पराभवाची कारणे

India Vs England 1st Test: इंग्लडच्या लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेल्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने या सामन्यात पाच शतके झळकावली, परंतु तरीही टीम इंडिया सामना गमावला. जयस्वाल, कर्णधार गिल आणि ऋषभ पंत यांनी पहिल्या डावात शतके झळकावली. दुसऱ्या डावात केएल राहुलने शानदार शतक झळकावले आणि ऋषभ पंतनेही शतक झळकावून इतिहास रचला. मात्र पाच शतके असूनही कसोटी गमावणारा भारत पहिला संघ ठरला आहे. 

भारतासाठ  जसप्रीत बुमराहनेही इंग्लंडच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. या कसोटीत भारतासाठी या काही सकारात्मक बाबी होत्या. प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या डावात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती खूप चांगली होती आणि त्यामुळे टीम इंडिया पुढील सामन्यात लढू शकेल अशी आशा निर्माण झाली आहे आणि त्यासाठी त्यांना कुलदीपची आवश्यकता असेल आणि निवडीत काही बदल करावे लागतील.

( नक्की वाचा : Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालनं इतिहास घडवला, सचिन, रोहित, विराटलाही जमलं नाही ते केलं! )

लीड्समध्ये टीम इंडियाचा पराभव का झाला?

 एनडीटीव्हीचे प्रतिनिधी बोरिया मजुमदार यांनी भारताच्या पराभवाची पाच कारणे दिली. ते म्हणाले की,  मॅचमध्ये चार वेळा अशी स्थिती होती जिथे तुम्ही इंग्लंडला बाद करू शकला असता. दुसऱ्या दिवशी भारताने 430/3 धावा केल्या होत्या. तिथून सहजपणे 500-550 धावा  काढता आल्या असत्या. तुम्ही 470 धावांवर आलात. दुसऱ्या डावात भारताची आघाडी 350 धावांवर होती आणि ती सहज 400-425 धावांवर नेऊ शकला असता. भारताच्या खालच्या फळीने (7 व्या क्रमाकानंतर नंतर) पहिल्या डावात 10 धावा आणि दुसऱ्या डावात 20 धावा जोडल्या.

"महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने सहा झेल सोडले. दुसऱ्या डावात 98 धावांवर बेन डकेटला जीवदान मिळाले. फिल्डिंगमधील चुकांमुळे 40-50 धावा दिल्या. भारताने हा सामना 100 टक्के जिंकू शकला असता, पण संघाने ती शिस्त दाखवली नाही. इंग्लंड त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हता. अनेक वेळा ते मागे होते, पण त्यांनी पुनरागमन केले आणि सामना हिसकावून घेतला. या सामन्यातील या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत

दुसरीकडे, या सामन्यातून भारतीय संघ कोणत्या सकारात्मक बाबी घेऊ शकतोबरेच सकारात्मक बाबी आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजी. सुरुवातीला वाटले आपण या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करू शकणार नाही. परदेशात भारतासाठी पाच शतके झळकावली गेली आहेत, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. शुभमन गिल, ऋषभ पंत फलंदाजी करत आहेत, यशस्वी जयस्वाल. हा एक उत्तम प्रयत्न होता आणि केएल राहुलचे शतक हे त्याचे आतापर्यंतचे सर्वोत्तम आहे. फलंदाजी हा सर्वात मोठा सकारात्मक पैलू होता. पहिल्या डावात बुमराहची विकेट, दुसऱ्या डावात प्रसिद्ध कृष्णाचा स्पेल देखील सकारात्मक होता." 

( नक्की वाचा : Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालनं इतिहास घडवला, सचिन, रोहित, विराटलाही जमलं नाही ते केलं! )

भारताने पहिली कसोटी गमावली आहे, त्यामुळे या मालिकेत ते पुनरागमन करू शकतील का आणि ही मालिका कोण किती फरकाने जिंकेल, याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, "येथून मालिकेचा अंतिम आकडा सांगणे खूप कठीण आहे. हा फक्त पहिलाच सामना आहे. तुम्ही पाहिले असेल की भारताने पाचही दिवस लढा दिला आहे. सामना शेवटच्या सत्रापर्यंत  शेवटच्या तासापर्यंत चालला. एकूणच हा एक उत्तम सामना होता. आतापासून कोणताही अंदाज बांधणे कठीण होईल."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com