
प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यानं दहावीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सिताराम सारडा विद्यालयामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरामुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
अहिल्यानगरमध्ये बागपट्टी भागात सिताराम सारडा विद्यालय आहे. या शाळेत आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं दहावीमध्ये शिकणाऱ्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. वसीमने मोहम्मदच्या कानामागे चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यानंतर शाळेतील शिक्षक अमोल कदम यांनी जखमी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
( नक्की वाचा : भयंकर! रुग्णवाहिका कुत्र्याला धडकली, संतापलेल्या मालकानं पेशंटचा जीव घेतला! )
क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये भांडण झालं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तोफखाना पोलीस स्टेशन अंतर्गत या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
ही दोन्ही मुलं सर्जेपुरा भागांमध्ये राहणारे असून त्यांची घरंही जवजवळ आहेत. या मुलांच्या घरांच्यांमध्ये कोणताही वाद नव्हता. पण, या दोन्ही मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन वाद होता. या वादातूनच ही घटना घडली. या घटनेनंतर शाळेत भीतीचं वातावरण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world