
अविनाश पवार, पुणे: पुण्याजवळच्या धायरीत स्वतःच्या दुकानावर दरोडा पडल्याचे भासवून एका सराफ व्यापाऱ्याने गावकऱ्यांनाच गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याजवळच्या धायरीमध्ये घडला आहे. या व्यापाऱ्याने गावकऱ्यांचे पाच ते सहा कोटी रुपये बुडवले असून पोलीस मात्र अद्याप बघ्याची भूमिका घेत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तब्बल पाच ते सहा कोटी हे सामान्य महिला आणि कामगार वर्गाच्या पैशांचा अपहार करून पुण्याजवळच्या धायरी मधील एका ज्वेलरीच्या मालकाने अख्खे गावच अडचणीत आणले आहे. जवळ जवळ अडीच हजार लोकांचे पैसे हे त्याने सोन्याची भिशी आणि इतर माध्यमातून गोळा केले आणि आपल्याच दुकानावर दरोडा पडल्याचा बनाव केला. धायरीमध्ये 15 एप्रिल 2025 रोजी श्री ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर दरोडा पडल्याच्या बातम्या सगळ्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या.
मात्र पोलीस तपासात त्याने स्वतःच्या चुलत भावाला हाताशी धरून बनावट पिस्तूल वापरून त्यामध्ये दरोडा पडल्याचे भासवले मात्र त्याला आर्थिक अडचण आली होती आणि लोकांचे पैसे हे न देण्याचा बहाणा करण्यासाठी त्यांनी हा सगळा बनाव केल्याचे उघड झाले. आता हा विष्णू दहिवाल फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत.मात्र याच धायरी गावातील नागरिक तो आसपास फिरत असून पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचे सांगतात.
Ashok Dhodi: अशोक धोडी अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट! सख्खा भाऊचं मुख्य आरोपी? खळबळजनक खुलासा
सामान्य कुटुंबातील महिलांनी पोटाला चिमटा घेऊन कुणी पाच पंचवीस हजार तर कुणी तब्बल 22 लाखांपर्यंतची गुंतवणूक या श्री ज्वेलर्सच्या सोन्याच्या भिशीमध्ये केल्याचे सांगितले आहे. मात्र पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. ज्या कामगार महिलेने 22 लाख गुंतवले तिचे तर यात घरच उध्वस्त झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world