
Punjab Wedding Scam: लग्नसोहळ्याचा दिवस.. नवरदेवाची वाजत-गाजत वरात नवरीच्या गावात आली. मात्र गावात पोहोचल्यानंतर नवरीच्या घरचा पत्ता ही खोटा निघाला अन् फोनही स्विचऑफ झाले. एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटावी अशी घटना पंजाबमध्ये घडली आहे, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमृतसरमध्ये एका तरुणाचा विवाह ठरला होता. ही सगळी सोयरीक नवरदेवाच्या एका नातेवाईकाने ठरवली होती. सुरुवातीला फोनवरुन चर्चा, बोलणी झाल्यानंतर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. लग्नाच्या आधी महिनाभर फोन, व्हिडिओ कॉल गप्पा-टप्पा सुरु होत्या. त्यानंतर लग्नाची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले मुलीकडच्यांनी मोगामधील गल्ली क्रमांक ५ चा पत्ता दिला होता, जिथे सकाळी 11 वाजता नवरदेवाची वरात पोहोचली.
गल्ली क्रमांक ५ वर पोहोचल्यावर नवरदेव आणि त्याच्या कुटुंबाला तिथे कोणीही सापडले नाही. कुठेही लग्नाची धामधूम नाही सजावट नाही, स्वागत नाही, पाहुणे नाहीत. नवरदेवाकडच्या मंडळींनी इकडे तिकडे चौकशी केली, लोकांकडे चौकशी केली पण मुलीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. शेवटी त्यांनी मुलीचा फोटो काढला आणि आजूबाजूच्या लोकांना दाखवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा - Sonam Raghuvanshi: ज्या 'राज'साठी राजाचा जीव गेला , तोच आला समोर, खतरनाक प्रेम कहाणी)
काहीतरी घोळ असल्याची शंका आल्यानंतर सर्वांनी मुलीच्या घरच्यांना फोन लावला मात्र मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा मोबाईल फोन आता बंद होता. तेव्हा सर्वांना काहीतरी गडबड असल्याचे समजले. वरातीत आलेली मंडळी दुपारपासून संध्याकाळपर्यंत मोगाच्या रस्त्यांवर फिरत राहिले. शेवटी दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिस आता सोशल मीडिया फसवणूक आणि सायबर गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही टोळ्या आता "लग्नाच्या" नावाखाली लोकांना फसवून पैसे आणि प्रतिष्ठा दोन्ही लुटत आहेत. मुलीचे फोटो, आधार तपशील आणि कॉल रेकॉर्डिंग तपासले जात आहेत.
Rajasthan Accident: भयंकर दुर्घटना! एकापाठोपाठ एक 11 मुले बुडाली, 8 जणांचा दुर्देवी मृत्यू
दरम्यान, वधूच्या नावावर फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर 2024 मध्येही एका कुटुंबाने दुबईहून वरात आणली होती, लग्नाचे ठिकाण आणि तारीख निश्चित करण्यात आली होती. मुलीने काही पैसेही मागितले होते जे पाठवण्यात आले. पण शेवटच्या क्षणी फोन बंद झाला आणि ठिकाणही चुकीचे असल्याचे समजले . त्या प्रकरणातही पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world