जाहिरात

Shashank Ketkar Post: "कार भंगारात द्या...", ठाण्यातील पार्किंगची पद्धत पाहून शशांक भडकला

Shashank Ketkar Post : शंशाक केतकर ठाण्यात जिथे राहतो त्या वसंत विहार भागात एका महाशयाने मुख्य रस्त्याच्या अर्ध्यावर आपली कार पार्क केली. डबल पार्किंगमुळे आधीच येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

Shashank Ketkar Post: "कार भंगारात द्या...", ठाण्यातील पार्किंगची पद्धत पाहून शशांक भडकला

Shashank Ketkar Post :  मुंबई-ठाणे या सारख्या शहरांमध्ये कार पार्किंग हा कळीचा मुद्दा बनला आहे. अनेकदा कार पार्किंगमुळे भांडणेही होतात. मात्र जागा अपुऱ्या आणि काही नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे ही समस्या आणखी गंभीर बनते. ठाण्यातील पार्किंगच्या बेशिस्तपणाचा एक नमुना अभिनेता शशांक केतकर याने सर्वांसमोर मांडला आहे. शशांकने आपल्या फेसबूक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केली आहे. 

शंशाक केतकर ठाण्यात जिथे राहतो त्या वसंत विहार भागात एका महाशयाने मुख्य रस्त्याच्या अर्ध्यावर आपली कार पार्क केली. डबल पार्किंगमुळे आधीच येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात एकाने आपली कार रस्त्याच्या अर्ध्यावर आणून ठेवली. वाहनांना थांबून थांबून जावं लागत आहेत. तर पायी जाणाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्तावरुन चालावं लागत आहे.  

(नक्की वाचा-  Divya Bharti : दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य 30 वर्षांनंतर उघड, सहकलाकारानं सोडलं मौन)

काय म्हणाला शशांक केतकर?

शशांकने व्हिडीओत म्हटलं की, "माणसाचं जगणं आणि आयुष्य स्वस्त आहे, याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. माझ्या बिल्डिंगच्या बरोबर समोर एका व्यक्तीने कमालीचं पार्किंग केलं आहे. उत्तर प्रदेश पासिंगची ही गाडी आहे. डबल पार्किंगमध्ये असलेली गाडी अगदी रस्त्याच्या मधोमध आली आहे. विद्यार्थांना देखील याचा त्रास होत आहे."

"या गाडीला आपटून चार माणसं मेली तर काय फरक पडत नाही. वसंत विहारमध्ये डबल पार्किंग करतात हा विषय मोठा आहेच. त्यामुळे त्यांच्या मागे पार्क केलेली कार काढण्यासाठी त्यांनी ही कार बाहेर सरकवली. ठाणे महापालिकेची यात काय जबाबदारी आहे माहित नाही. पण ही गाडी फक्त उचलू नका तर ही गाडी भंगारात द्या", असा संताप शंशाकने व्यक्त केला. 

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

युजर्सच्या पोस्ट

शंशाकच्या या पोस्टवर अनेकांना प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत म्हटलं की, "अगदी 100% खरं आहे, तुझं म्हणणं. आता ज्याची गाडी आहे तो येऊन सांगेल."अरे भाई बस 2 मिनिट का काम था, यही पे बाजू में गया था"! जाने दो ना. आजकाल लोक पार्किंग करताना फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात. बाजूचा गाडी कशी काढेल लोकांना जायला यायला जागा आहे का, आपल्यामुळे कोणाला त्रास तर नाही ना होणार, ह्या अशा बेफिकीर लोकांना कोणाचीच पडलेली नसते. आता हे टो वाले कुठे कडमडलेत. आम्ही कधी शिस्तीत 2 सेकंद जरी गाडी लावून पाणी जरी विकत आणायला गेलो तरीही कुठण प्रकट होतात देव जाणे."

आणखी एकाने कमेंट केली की, "शशांक, अशा प्रकारचे पोस्ट टाकावी लागते हे खरचं दुर्दैवी आहे. तू टाकलेली पोस्ट स्तुत्य आहे. माणूस कितीही शिकला, प्रगत झाला तरीही आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो किंबहुना यामुळे एखाद्याचा जीवही जावू शकतो ही भावना जर चुकून ही त्याला नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com