जाहिरात

Iran War: युद्धादरम्यान भारतासाठी 5 गुड न्यूज! गॅसची चिंता मिटणार?

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर 40,000 टन एलपीजी घेऊन 'शिवालिक' जहाज भारतात पोहोचले आहे. भारताच्या यशस्वी कूटनीतीमुळे गॅस टंचाईची भीती दूर झाली असून पैनिक बुकिंगमध्येही मोठी घट झाली आहे.

Iran War: युद्धादरम्यान भारतासाठी 5 गुड न्यूज! गॅसची चिंता मिटणार?
  • मध्य पूर्व में तनाव के बीच शिवालिक जहाज होर्मुज स्ट्रेट सुरक्षित पार कर 40,000 टन LPG लिए भारत पहुंचाया.
  • नंदा देवी टैंकर के आने से भारत को लगभग 92,712 मीट्रिक टन एलपीजी आपूर्ति में महत्वपूर्ण बढ़ोतरी होगी.
  • LPG की आपूर्ति देशभर में स्थिर बनी हुई है और पैनिक बुकिंग में कमी आई है, जिससे उपभोक्ताओं को राहत मिली है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नई दिल्ली:

मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकटाची भीती व्यक्त केली जात असताना, भारतासाठी सोमवारचा दिवस प्रचंड दिलासादायक ठरला. भारताने आपल्या यशस्वी कूटनीतिक प्रयत्नांद्वारे होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पार करून गॅसने भरलेली जहाजे सुखरूप मायदेशी आणली आहेत.

गेल्या 17 दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताचा गॅस पुरवठा खंडित होण्याची शक्यता होती. मात्र, भारत सरकारने इराणसोबत केलेल्या यशस्वी चर्चेनंतर होर्मुजच्या सामुद्रधुनीतून अडकलेली जहाजे बाहेर काढण्यात यश आले आहे. सोमवारी संध्याकाळी 'शिवालिक' हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल झाले, ज्यामुळे देशातील गॅस टंचाईचे सावट दूर झाले आहे.
 

गुजरात के मुंद्रा पोर्ट पर शिवालिक जहाज.

'शिवालिक' भारतात दाखल, 'नंदा देवी' मार्गावर

सुमारे 40,000 मेट्रिक टन एलपीजी (LPG) घेऊन 'शिवालिक' जहाज सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मुंद्रा बंदरात पोहोचले. भारताच्या विनंतीनंतर इराणने या जहाजाला होर्मुज सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याची परवानगी दिली. तसेच, दुसरे मोठे जहाज 'नंदा देवी' आज (मंगळवारी) सकाळी भारतात पोहोचणे अपेक्षित आहे.

एकूण 92,712 मेट्रिक टन गॅसचा साठा मिळणार

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन जहाजांमुळे देशाला एकूण 92,712 मेट्रिक टन एलपीजी उपलब्ध होणार आहे. भारत आपल्या गरजेच्या 60% गॅस आयात करतो, ज्यातील 90% भाग याच होर्मुज सामुद्रधुनीतून येतो. युद्धामुळे अडकलेल्या 22 कार्गो जहाजांपैकी या दोन मोठ्या जहाजांचे येणे भारतासाठी मोठी लष्करी आणि कूटनीतिक विजय मानला जात आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: किंकाळ्या, धडपड अन् वेदना; भटक्या कुत्र्यांनी 15 मिनिट लचके तोडले, महिलेचा तडफडून जागीच मृत्यू)

Latest and Breaking News on NDTV

पॅनिक बुकिंगमध्ये 10 लाखांहून अधिक घट

गॅस संपेल या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर 'पॅनिक बुकिंग' सुरू केली होती. मात्र, पुरवठा सुरळीत झाल्याच्या बातमीने ही बुकिंग 13 मार्चच्या 88.8 लाखांवरून 14 मार्चला 77 लाखांवर आली आहे. विशेष म्हणजे 90% बुकिंग आता ऑनलाईन होत असल्याने पारदर्शकता वाढली आहे.

(नक्की वाचा-  Shocking News: हृदयद्रावक! मेकॅनिकचा एक सल्ला अन् अख्ख कुटुंब उद्ध्वस्त; 3 नातवांसह आजोबांचा झोपेतच मृत्यू)

PNG कनेक्शनकडे कल वाढला

गॅस सिलिंडरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार आता PNG (Piped Natural Gas) कनेक्शनला प्रोत्साहन देत आहे. ज्यांच्याकडे पीएनजी आहे, त्यांनी एलपीजी सिलिंडर सरेंडर केल्यास गरजू ग्रामीण भागातील लोकांना गॅस मिळणे अधिक सुलभ होणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

2.20 लाख भारतीय सुखरूप मायदेशी

युद्ध सुरू झाल्यापासून (28 फेब्रुवारी 2026) आतापर्यंत पश्चिम आशिया आणि आखाती देशांतून सुमारे 2,20,000 भारतीय सुखरूप परतले आहेत. दुबई विमानतळावरील विस्कळीत झालेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत असून, आज भारतात येण्यासाठी 45 हून अधिक विमाने नियोजित आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com