जाहिरात

उपराष्ट्रपती निवडणूक; भाजपची चाल विरोधकांमध्ये फूट पाडणार; सी.पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचा अर्थ काय?

मागील काही निवडणुकांमध्ये पाहिले तर अनेकदा विविध कारणांमुळे विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याची उदाहरणे आहेत. यावेळीही काही विरोधी पक्ष सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देऊ शकतात.

उपराष्ट्रपती निवडणूक; भाजपची चाल विरोधकांमध्ये फूट पाडणार; सी.पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचा अर्थ काय?

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) उपराष्ट्रपतीपदासाठी मोठी खेळी करत तामिळनाडूचे नेते सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. सी पी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला एनडीएची एक विचारपूर्वक केलेली चाल मानली जात आहे, ज्याचा उद्देश दक्षिण भारतात भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत करणे आहे.

विरोधकांमध्ये फूट पडण्याची शक्यता

मागील काही निवडणुकांमध्ये पाहिले तर अनेकदा विविध कारणांमुळे विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याची उदाहरणे आहेत. जेव्हा यूपीएने प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवले होते, तेव्हा महाराष्ट्रातील असल्यामुळे शिवसेनेने एनडीएचा भाग असूनही त्यांना पाठिंबा दिला होता.

(नक्की वाचा-  C.P. Radhakrishnan: उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळालेले सी.पी. राधाकृष्णन कोण? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?)

प्रणब मुखर्जी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतानाही शिवसेनेने आणि जेडीयूने त्यांना पाठिंबा दिला होता.रामनाथ कोविंद यांना एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवल्यावर जेडीयूने विरोधी पक्षात असूनही त्यांना पाठिंबा दिला, कारण ते बिहारचे राज्यपाल होते. जगदीप धनखड उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असताना, तृणमूल काँग्रेसने मतदानात भाग घेतला नाही आणि धनखड सर्वाधिक मतांनी विजयी झाले.

यावेळीही बिजू जनता दल (BJD), वायएसआरसीपी (YSRCP) आणि बीआरएस (BRS) सारखे पक्ष, ज्यांचे 22 खासदार आहेत, ते एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar: 'ते' वक्तव्य करून अजित पवार मला सतत टॉर्चर करतायत', राम शिंदे थेटच बोलले)

तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या डीएमकेसाठी हा निर्णय कठीण असेल. त्यांचे 32 खासदार आहेत आणि त्यांच्या राज्यातील उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा त्यांना विचार करावा लागेल. जर सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती बनले, तर ते तामिळनाडूचे तिसरे उपराष्ट्रपती असतील. ज्यामुळे डीएमकेसाठी राजकीयदृष्ट्या हा एक नाजूक निर्णय असेल. कारण पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये निवडणुका आहेत.

तरीही, 'इंडिया' आघाडीने आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, भाजपविरोधी पक्षांची भूमिका त्यांचा उमेदवार कोण असेल, यावर अवलंबून असेल. राधाकृष्णन यांच्या निवडणुकीची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सांभाळतील. तर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू त्यांचे निवडणूक एजंट असतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com