Pahalgam Terrorist Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा 28 पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. पाच अतिरेक्यांना निशाणा बनवून पर्यटकांना जीवे मारलं. सुदैवाने या दहशतवादी हल्ल्यातून अनेक पर्यटक थोडक्यात बचावले आहे. काहीजण घोडे तर काही जण चायनिज फ्राईड राईसमुळे बचावले आहेत. त्यांना आपला अनुभव सांगितला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. पर्यटकांना मंगळवारी दुपारी घोड्यांच्या प्रतीक्षेमुळे बैसरण खोऱ्यातील त्यांच्या प्रवासाला उशिरा झाला. आम्हाला जर उशीर झाला नसता तर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही घटनास्थळी असतो. तसेच मृतांच्या यादीत आमचीही नावे असती," असं पर्यटकांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार)
घोड्यांमुळे वाचला जीव
महाराष्ट्रातील बचावलेल्या या पर्यटकांनी सांगितलं की, घोडे मालकांनी सुरुवातीला प्रति घोडे 3200 रुपये मागितले होते. आम्ही त्यांच्याशी जवळजवळ 15 मिनिटे घासाघिस करण्यात घालवली. सर्व 28 घोडे एकत्र करण्यात आणखी 15 मिनिटे वेळ गेला. शेवटी बराच वेळानंतर आम्ही घोड्यांवर बसलो आणि 2 किमीच्या प्रवासापैकी जेमतेम 500 मीटर अंतर पार केले. तेव्हा दहशतवादी हल्ला झाल्याचं आम्हाला कळालं. त्यानंतर आम्ही पुन्हा मागे फिरलो.
(नक्की वाचा- Pahalgam Attack: हाताची मेंदी जाण्या आधीचं कुंकू पुसलं, हनिमूनला गेलेल्या जोडप्याबरोबर भयंकर घडलं)
चायनिज फ्राईड राईस पथ्यावर
एका कुटुंबासोबतही असंच काहीसं घडलं. केरळमधील 11 जणांचं एक कुटुंब बैसनरला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. तेथे त्यांना फ्राईड राईस मागवलं. मात्र फ्राईड राईसमध्ये जास्त मीठ असल्याची तक्रार या कुटुंबाने केली. त्यावेळी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फ्राईड राईस पुन्हा बनवून दिलं. मात्र यासाठी त्यांना बराच वेळ थांबावं लागलं. याच दरम्यान दहशतवादी हल्ला झाला. मात्र त्यांनी आधीचा फ्राईड राईस संपवला असता तर ते देखील हल्ला झाला त्या ठिकाणी उपस्थित असते. मात्र फ्राईड राईसमुळे मोठा अनर्थ टळला.