Tahawwur Rana
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी तहव्वुर राणा भारताच्या ताब्यात आला आहे. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड आहे. एनआयए प्रथम तहव्वुर राणाची चौकशी करेल. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवले जाऊ शकते. या सगळ्या घडामोडींदरम्यान तहव्वुर राणाबाबत पाकिस्तानने मोठं भाष्य केलं आहे.
पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, तहव्वुरचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही आणि तो कॅनेडियन नागरिक आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तहव्वुरबाबत म्हटले आहे की, राणाचे पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रे गेल्या दोन दशकांपासून अपडेट केलेली नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सूत्रांच्या माहितीनुसार, 64 वर्षीय तहव्वुर राणा आज दुपारपर्यंत दिल्लीत पोहोचेल. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडून त्याला तत्काळ अटक केली जाईल. तहव्वुर राणाच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली विमानतळाचेही छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. विमानतळाच्या आत असो किंवा बाहेर, SWAT कमांडोसह विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Tahawwur Rana : तहव्वुर राणा 16 वर्षांना ताब्यात येणार; 26/11 हल्ल्याच्या अनेक गोष्टी उलगडणार)

मुंबईवरील हल्ल्यात 166 नागरिकांचा मृत्यू
2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यांनी मुंबई हादरली होती. या हल्ल्यात 166 जणांना जीव गमवावा लागला होता. तहव्वुर ताब्यात आल्याने आता मुंबईवरील हल्ल्याचा कट नेमका कसा रचला गेला याची माहिती मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणांना मिळणार आहे.
(नक्की वाचा- 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 17 वर्षांनी भारतात आणणार, तहव्वुर राणाला कुठे ठेवणार?)
हल्ल्यापूर्वी राणा भारतात आला होता
राणा 11 नोव्हेंबर 2008 रोजी दिल्लीला आला होता. त्यावेळी सुमारे 11 दिवस भारतात राहिला. दरम्यान तो 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी दोन दिवस पवई येथील एका हॉटेलमध्ये राहिला. दोन दिवसांनी, राणा हल्ल्याच्या एक आठवडा आधी, दुबईला रवाना झाला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री 10 पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले. त्यांनी सीएसएमटी, हॉटेल ताजमहाल पॅलेस, ट्रायडंट हॉटेल, नरिमन हाऊस आणि इतर ठिकाणी हल्ला केला. यामध्ये डझनभराहून अधिक परदेशी लोकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल, 60 तासांच्या कारवाईत, एनएसजी आणि इतर सुरक्षा एजन्सींनी नऊ दहशतवाद्यांना ठार मारले, तर कसाबला पकडण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world