Meno Divorce: मेनो डिव्होर्स म्हणजे काय? 'या' गोष्टीमुळे सुखी संसारात पडतोय मिठाचा खडा, धक्कादायक कारण समोर

Meno Divorce: मेनोपॉज (रजोनिवृत्ती) दरम्यान महिलांमध्ये वाढणारा घटस्फोटाचा ट्रेंड म्हणजेच 'मेनो-डिव्हॉर्स' नक्की काय आहे? वाचा तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Meno Divorce: मेनो-डिव्होर्स म्हणजे काय?"
Canva

Meno Divorce: ज्याप्रमाणे मासिक पाळी (पीरियड्स) येणे, मुलांना जन्म देणे इत्यादी महिलांच्या आयुष्यात येणारे काही टप्पे आहेत, त्याचप्रमाणे मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा देखील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल पाहायला मिळतात. मेनोपॉजच्या टप्प्यात महिलांची मासिक पाळी येणे बंद होते. या काळात महिलांमध्ये झोप न येणे, घाम येणे यासारख्या समस्या पाहायला मिळतात. पण अलीकडच्या काही वर्षांत मेनोपॉजशी संबंधित एक शब्द खूप वेगाने चर्चेत येत आहे आणि तो म्हणजे 'मेनो-डिव्हॉर्स' (Meno-divorce). हा शब्द तेव्हा वापरला जातो, जेव्हा प्री-मेनोपॉज किंवा मेनोपॉज दरम्यान महिला आपल्या वैवाहिक संबंधांवर पुन्हा विचार करू लागतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे कि, महिलांच्या मनात असे विचार येण्यासाठी केवळ हार्मोन्सच जबाबदार नसतात तर त्यांची मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती देखील तितकीच जबाबदार असते, ज्यामुळे त्या असा निर्णय घेतात.

केवळ हार्मोनल बदलच कारणीभूत आहेत का?

रिलेशनशिप थेरपिस्ट्सच्या मते, 45 ते 45 वर्षे वयोगटातील अनेक महिलांना असे वाटू लागते की आता त्यांना स्वतःच्या गरजा आणि इच्छांकडे दुर्लक्ष करायचे नाही. अनेक वर्षे कुटुंब आणि मुलांना प्राधान्य दिल्यानंतर त्या आपल्या वैवाहिक नात्यावर पुन्हा विचार करू लागतात. याच फ्रीक्वेन्सीला आता 'मेनो-डिव्हॉर्स' म्हणून ओळखले जात आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Belly Fat Loss Tips: 'मी फक्त 2 पोळ्या खातो, तरीही ढेरी का सुटतेय?' सपाट पोट हवंय पण नेमकं काय चुकतंय? वाचा)

मेनोपॉज दरम्यान महिला नात्यावर पुन्हा विचार का करतात?

तज्ज्ञांचे सांगणे आहे की, मेनोपॉज दरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यासारख्या हार्मोन्समध्ये बदल नक्कीच होतात. याचा परिणाम मूड, झोप, संयम, चिंता आणि लैंगिक इच्छेवर होऊ शकतो. यामुळे महिलांची भावनिक सहनशीलता कमी होऊ शकते, पण केवळ हार्मोन्स एखादा सुखी संसार मोडू शकत नाहीत. उलट ते नात्यात आधीपासून असलेल्या समस्या अधिक स्पष्टपणे समोर आणतात.

रिलेशनशिप समुपदेशकांचे असे मत आहे की, मेनोपॉजचा काळ हा महिलांसाठी स्वतःबद्दल विचार करण्याचा काळ असतो. जेव्हा मुले मोठी होऊन स्वावलंबी होतात आणि घराच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी होऊ लागतात तेव्हा अनेक महिला स्वतःलाच प्रश्न विचारतात की, त्यांना पुढील आयुष्यही असंच घालवायचं आहे की काही बदलाची गरज आहे.

(नक्की वाचा: Depression Symptoms: सतत लोकांचे फोन टाळताय? एकटेच राहताय? धोक्याची घंटा ओळखा, नाहीतर होईल मोठं नुकसान)

आर्थिक स्वातंत्र्यामुळे बदलला महिलांचा विचार

तज्ज्ञ सांगतात की, आजच्या महिलांकडे एक अशी गोष्ट आहे जी आधीच्या पिढ्यांकडे सहसा नव्हती आणि ती म्हणजे स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजाची बदलती विचारसरणी यामुळे महिलांना हा आत्मविश्वास मिळाला आहे की, जर एखादे नाते सातत्याने त्रासदायक किंवा तणावाचे कारण ठरत असेल तर त्या त्यावर पुन्हा विचार करू शकतात.

Advertisement

एकमेकांची साथ असेल तर हा टप्पा सोपा होऊ शकतो

अनेक तज्ज्ञ असेही म्हणतात की, मेनोपॉज दरम्यान अनेक महिलांना त्यांच्या जुन्या वेदना किंवा कुटुंबातील सदस्यांनी भूतकाळात बोललेल्या काही गोष्टी आठवू लागतात. अशा परिस्थितीत जर पती-पत्नीमध्ये भावनिक अंतर असेल तर ही परिस्थिती आणखी बिघडू शकते. पण जर जोडप्यामध्ये प्रेम आणि आदर असेल तर हा टप्पा सहज पार केला जाऊ शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)