जाहिरात

Depression Symptoms: सतत लोकांचे फोन टाळताय? एकटेच राहताय? धोक्याची घंटा ओळखा, नाहीतर होईल मोठं नुकसान

Depression Symptoms: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एकांत आणि सोशल आयसोलेशन यातील सूक्ष्म फरक समजून घेणे का आवश्यक आहे? वाचा सविस्तर माहिती

Depression Symptoms: सतत लोकांचे फोन टाळताय? एकटेच राहताय? धोक्याची घंटा ओळखा, नाहीतर होईल मोठं नुकसान
"Depression Symptoms: लोकांपासून दूर एकटे राहणे चिंतेचा विषय?"
Canva
  • वेगवान जीवनशैलीमुळे कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक चिंता लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात
  • एकांत ताणतणाव कमी करण्यास आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत करतो, मात्र सतत एकटे राहणे चिंताजनक ठरू शकते
  • एकांत आणि सोशल आयसोलेशन यामध्ये फरक समजून घेणे महत्त्वाचे असून सोशल आयसोलेशन मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरते

Depression Symptoms: आजच्या वेगवान जीवनात कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता आणि सतत बदलणारी जीवनशैली लोकांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करत आहे. अशा वातावरणात अनेक लोकांना काही वेळ एकटे राहणे आवडते. बऱ्याच जणांना असे वाटते की एकटे राहण्याने त्यांना शांतता मिळते. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. काही लोकांना मित्र किंवा नातेवाईकांना भेटून बरे वाटते, तर काहींना एकटे राहिल्यानंतर मानसिक शांतता मिळतो. अशा लोकांसाठी हा एकटेपणा नसून एकांत असतो.

काळजी कधी करावी? 

मानसशास्त्रीय संशोधनानुसार, मर्यादित वेळेचा एकांत ताणतणाव कमी करण्यास, भावना समजून घेण्यास आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत करू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा एकटे राहण्याची सवय हळूहळू सामाजिक अंतर ठेवण्यात (सोशल आयसोलेशन) बदलू लागते. जर एखादी व्यक्ती सतत मित्र, कुटुंब किंवा सहकाऱ्यांना भेटणे टाळू लागली, फोन उचलणे बंद करत असेल, संभाषणात रस घेत नसेल किंवा ज्या लोकांसोबत पूर्वी वेळ घालवणे आवडत होते त्यांच्यापासूनही अंतर राखू लागली, तर हे सामान्य वर्तन मानले जात नाही. हे मानसिक ताण, चिंता (Anxiety) किंवा नैराश्य (Depression) यासारख्या समस्यांचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

फरक समजून घेणे आहे महत्त्वाचे

सायकोलॉजिस्टनुसार एकांत आणि सोशल आयसोलेशन यातील फरक समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. एकांतात व्यक्ती एकटी नक्कीच असते, पण गरज पडल्यास लोकांसोबत जोडले जाण्यात तिला कोणतीही अडचण येत नाही. ती आपल्या कामाच्या, कुटुंबाच्या आणि नात्यांच्या जबाबदाऱ्या सामान्य पद्धतीने पार पाडत राहते. दुसरीकडे सोशल आयसोलेशनमध्ये व्यक्ती हळूहळू नात्यांपासून दुरावते, इतरांना भेटण्याची इच्छा संपू लागते आणि अनेकदा जीवनातील उत्साहही कमी होतो. ही परिस्थिती दीर्घकाळ राहिली तर मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते.

(नक्की वाचा: Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी, फायदेशीर काय? वेटलॉस आणि ब्लडशुगर कसे होईल कमी? जाणून घ्या सत्य)

शरीरावर होतो परिणाम

वैद्यकीय आणि मानसशास्त्र संशोधन असे दर्शवते की दीर्घकाळ सोशल आयसोलेशनमध्ये राहिल्याने शरीरावरही परिणाम होतो. सतत एकटे राहिल्याने तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सचे विशेषतः कोर्टिसोलचे प्रमाण वाढू शकते. याचा परिणाम झोप, स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही होऊ शकतो. अनेक अभ्यासांमध्ये असेही आढळून आले आहे की, दीर्घकाळ सामाजिक अंतर राखणाऱ्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याचा धोका अधिक पाहायला मिळतो.

(नक्की वाचा : Tissue Paper: टिश्यू पेपर पांढराच का असतो? कारण ऐकून पुढच्या वेळी रंगीत टिश्यू वापरताना 10 वेळा विचार कराल)

नेमके काय करावे?

रोज काही वेळ मोकळ्या वातावरणात फिरणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि नियमित शारीरिक हालचाली मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. योग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम उदाहरणार्थ भ्रामरी प्राणायाम, बालासन आणि सेतुबंधासन, तणाव कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या देखील मानसिक संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com