सुनील दवंगे, शिर्डी
Sunil Shetty News : सध्या राज्यात शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी सक्तीवर वादंग उठलेलं असताना अभिनेता सुनिल शेट्टीनं मराठीत बोलून सर्वांनाच सुखद धक्का दिलाय. सुनिल शेट्टी आज शिर्डीला साईबाबा चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी मी मुंबईत राहतो माझी जन्मभूमी कर्नाटक जरी असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. प्रत्येक माणसाला कर्मभूमीची भाषा यायला हवी असं सुनिल शेट्टीनं स्पष्ट केलं.
(नक्की वाचा- Kolhapur Politics: "आदित्य साहेबांचे शब्द जिव्हारी लागले", कोल्हापूरच्या 'या' नेत्याने सोडली ठाकरेंची साथ)
"मी कर्नाटकचा आहे म्हणून मला मराठी आली नाही तरी चालेल. पण मराठी आले तर तुम्हा सर्वांना बरं वाटतं. मात्र मला मराठी नाही आली तर दुसऱ्यांना नाहीतर मला त्रास झाला पाहिजे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायचे आहे" ,असे म्हणत एका प्रकारे सुनील शेट्टीने मराठी भाषेचा मान राखलाय.
अभिनेता सुनील शेट्टीने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधला. पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घालावी अशी ठाम भूमिका पहिल्यापासूनच मी मांडत आलो असल्याच शेट्टी म्हंटलाय.
(नक्की वाचा- "5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार", राज ठाकरे यांची घोषणा)
"मी सुरुवातीपासून म्हणतोय की, ज्या लोकांमुळे आपल्या देशाला त्रास होतो. अशा लोकांशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घातली पाहिजे. केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर क्रिकेट, राजकारण, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पाकिस्तानशी संबंध तोडले पाहिजेत. भारत-पाकिस्तानमधील वातावरण शांत होत नाहीत तोपर्यंत संबंध ठेवले नाही पाहिजेत", अशी स्पष्ट भूमिका सुनिल शेट्टी यांनी मांडली.