
ओंकार कुलकर्णी, धाराशिव: खेळत असताना पाण्याच्या हौदात पडून अडीच वर्षाचा बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथे घडली. दोन दिवसांपूर्वीच हा चिमुकला मामाच्या गावावरुन परतला होता. घराजवळ खेळत असताना तो जनांवरांच्या पाण्याच्या हौदात पडला. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूने मनाला चटका लावला आहे. समर्थ चव्हाण असे या चिमुकल्याच नाव आहे. दोन दिवसापूर्वी मामाच्या गावाहून परतलेल्या समर्थचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. घराजवळच खेळत असताना जनावरांसाठीच्या पाण्याच्या हौदात चिमुकला पडला.
सोबतच्या लहान बहिणीने आरडाओरड केल्याने त्याला बाहेर काढत तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, त्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. मुलाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, योग्य उपचार झाले असते तर मुलगा वाचला असता असे आरोपही यावेळी नातेवाईकांनी केले.
(नक्की वाचा- Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)
दुर्दैवी म्हणजे मुलगा हौदात पडल्याचे समजताच आईने तुळजापूर मंदिराकडे धाव घेतली. एक किलोमीटर धावत जात आईने महाद्वारावर दंडवत घातला. पण नियतीने घात केला अन् या घटनेत चिमुकल्याचा अंत झाला. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेने सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
(नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video ))
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world