
सुनील दवंगे, शिर्डी: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगीही पडल्याचेही पाहायला मिळाले. अशातच आता माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या नव्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. या विधानाने माणिकराव कोकाटेंनी एक प्रकारे सरकारच्या अपयशाची कबुलीच दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
शेतीवर अवलंबून असणारा वर्ग कमी होत चालला आहे, कारण शेती परवडत नाही. याचे कारण शेतक-यांना शाश्वत शेतीमालाचे दोन पैसे मिळतील अशी व्यवस्था सरकार म्हणून आम्ही करु शकलो नाही, अशी खंत स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे. माणिकराव कोकाटे यांनी या वक्तव्यातून एक प्रकारे राज्य सरकारला घराचा आहेरच दिला आहे.
विक्री व्यवस्था प्रबळ केल्याशिवाय उत्पादनाला महत्व प्राप्त होणार नाही, कमी खर्चात चांगल उत्पादन आणि विक्रीची व्यवस्था यांची मुल्यसाखळच्या माध्यमातून एकमेकांना जोडलो गेलो तरच भविष्याकाळ उज्ज्वल होवू शकतो. शेतकरी दुध सहकारी संस्था स्थापना करण्यास तयार नाही, खाजगी मधून दुध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतात. यात गुजरात राज्याच फार मोठं अतिक्रमण होत असून गुजरात राज्यात सहकारी व्यवसाय जोरात असून आपण महाराष्ट्र फार कमी असल्याचेही माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा - Pune Palkhi 2025 Live Check : संत तुकाराम महाराजांची पालखी मगरपट्टा पुलावरुन वैभव थिएटरजवळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world