Maharashtra Rain Update : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये (17 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात 83.4 मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात 73.7 मिमी, मुंबई शहर 62.9 मिमी, रायगड 54.1 मिमी  आणि पालघर जिल्ह्यात 49.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 17 जून 2025 रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)  

क्रमांक जिल्हा पावसाची सरासरी आकडेवारी (सर्व आकडे मि.मीमध्ये)  
1 ठाणे  73.7
2 रायगड 54.1
3 रत्नागिरी 47.7
4 सिंधुदुर्ग  12.7
5 पालघर 49.7
6 नाशिक 7.7
7 धुळे 7.1
8 नंदुरबार  4
9 जळगाव 6.7
10 अहिल्यानगर 1.1
11 पुणे 11.9
12 सोलापूर 0.9
13 सातारा 19.7
14 सांगली 6
15 कोल्हापूर 17.8
16 छत्रपती संभाजीनगर 0.6
17 जालना 0.1
18 बीड 0.7
19 लातूर 0.1
20 धाराशिव 1.6
21 नांदेड  3.6
22 परभणी  1.7
23 हिंगोली 3.6
24 बुलढाणा  3.5
25 अकोला  8.7
26 वाशिम 8.5
27 अमरावती 9.4
28 यवतमाळ  8.7
29 वर्धा 7.6
30 नागपूर  0.9
31 गोंदिया 0.2
32 चंद्रपूर 11.9
33 गडचिरोली 5.2

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर 100 मीटर परिसरात भेगा पडल्याने या  महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी,  स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

Topics mentioned in this article