
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून तणाव आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ले केलेच पण पाकिस्तानने केलेले हल्लेही परतवून लावले. या तणावाच्या परिस्थितीत अनेक भारतीय फौजींची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यांना तातडीने सीमेवर येण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशा स्थितीत कुणी नुकतच लग्न झालेला जवान असेल किंवा कुणी सुट्टीसाठी कुटुंबा बरोबर वेळ घालवण्यासाठी आलेला जवान असेल त्यांना आदेश मिळताच ते सीमेवर देशाच्या रक्षणासाठी रवाना झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लक्ष्मण सोनवणे हे ही त्या पैकी एक आहे. ते बीड जिल्ह्यातील केड तालुक्यातल्या मस्साजोगचे रहावीशी आहे. ते भारतीय सैन्यात आहेत. अनेक वर्ष सीमेवर सेवा दिल्यानंतर ते दोन महिन्यासाठी गावी सुट्टीवर आले होते. पण त्याच वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यांना तातडीने फोन आला. तुम्हाला सीमेवर रक्षणासाठी यायचं आहे. त्यांनी कसला ही विचार न करता आपली बॅग भरली आणि आपल्या कुटुंबाला बाय बाय करत सीमेवर जाण्यासाठी तयार झाले.
ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट
ते ज्यावेळी गावातून जाण्यासाठी निघाले त्यावेळी संपूर्ण गाव त्यांना रेल्वे स्टेशन पर्यंत सोडण्यासाठी आला होता. एक मिरवणूक निघते तसा माहोल गावात होता. भारत माता की जय च्या घोषणा दिल्या जात होता. लक्ष्मण यांना तर कधी सीमेवर जातोय असं वाटत होतं. त्यांचा उत्साहही पाहण्या सारखा होता. देशासाठी काही करावं लागलं तरी चालेल. आधी देश नंतर कुटुंब अशीच भावना लक्ष्मण सोनवणे यांच्या मनात होती. त्यामुळे जसा निरोप मिळाला त्याच्या दुसऱ्या क्षणाला ते देशाच्या सेवेसाठी निघाले.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील जवान अशितोष लक्ष्मण सोनवणे हे 2 महिन्याच्या सुट्टीवर आले होते. भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जवान अशितोष यांना सैन्यदलातून पत्र आल्यानंतर लढाईत सहभागी होण्यासाठी दहा दिवसातच त्यांना परत जावं लागलंय. परत जाताना पत्नी, आई -वडील, कुटुंब आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते. पण लक्ष्मण यांनी सर्वांना धीर दिला. कुटुंबाबरोबर आपण आहोच पण आधी देश महत्वाचा आहे हे त्यांना सर्वाना सांगितलं. त्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्या मागे खंबीर पणे राहिला. त्यांना गावकऱ्यांनी निरोप दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world