
विशाल पुजारी, प्रतिनिधी
त्यांचं अवघ्या महिनाभरापूर्वी लग्न झालं होतं. त्यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या साक्षीनं सात जन्म एकमेंकाना साथ देण्याचा संकल्प केला. नव्या आयुष्याची, सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. पण, जेमतेम महिनाभरात त्यांची सारी स्वप्न उद्धवस्त झाली. एका चुकीमुळे या जोडप्याचा मृत्यू झाला. कोल्हापूरमधील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे कोल्हापूर हादरले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील बुरुडे येथील भावेश्वरी कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील, सागर सुरेश करमळकर (वय 32 ) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर ( वय 26) ( दोघेही मूळ गाव शिवाजीनगर आजरा ) यांचा मृत्यू झाला आहे.
( नक्की वाचा : Mumbai Local : बदलापूर - CSMT लोकलला गळती, ऐन गर्दीत प्रवाशांची तारांबळ )
सागर आणि सुषमा यांचा विवाह 20 मे यादिवशी झाला होता. रविवारी सागर पत्नीसोबत आंबोलीला फिरण्यासाठी गेला होता. तेथून घरी आल्यानंतर तो फोन उचलत नव्हता त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. सोमवारी सकाळी (16 जून 2025) बुरुडेपैकी भावेश्वरी कॉलनीतील घरी भेटण्यासाठी मित्र गेले. यावेळी घराच्या समोरील दरवाजाला किल्ली अडकवलेली आणि दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
( नक्की वाचा : Shirdi News : वाढदिवसासाठी खून ! 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करून केली पार्टी..! )
मित्रांनी हाका मारत आत गेल्यावर त्यांना गॅसचा वास आला. बाथरूममधील गॅस गिझरची गळती होऊन गुदमरून दोघेही बाथरूममध्ये पडल्याचे त्यांना दिसले.. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेची माहिती आजऱ्यात समजताच भावेश्वरी कॉलनीत एकच गर्दी झाली होती. लग्न होऊन महिना होण्याआधीच दाम्पत्याच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतेय. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world