जाहिरात

Agriculture News : मृगबहर धोक्यात, मोसंबीला अवकाळीचा तडाखा; उत्पादकांचं मोठं नुकसान

जालना जिल्ह्यात 29 हजार हेक्टर मोसंबीला बागा धोकात आल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Agriculture News : मृगबहर धोक्यात, मोसंबीला अवकाळीचा तडाखा; उत्पादकांचं मोठं नुकसान

मोसंबीचं आगार समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील आधीच अडचणीत असलेल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मान्सूनपूर्व अवकाळी पाऊसाने अधिक भर घातल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंत्तेत भर पडली आहे. जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाचा फटका मोसंबी बागांना बसला आहे. त्यामुळे मृगबहार आणि आंबे बहरावर हवामान बदलाचा मोठा परिणाम झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिल्ह्यात साधारणत: 29 हजार 636 हेक्टर क्षेत्रावर मोसंबीचे उत्पादान घेतलं जातं मात्र यंदा वेळेपूर्वीच आलेल्या आणि अनियमित झालेल्या पूर्वमान्सून पावसामुळे मोसंबीच्या बहरावर याचा मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः मृगबहार पूर्णतःधोक्यात आला आहे. अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम झाल्याने मृगबहार फुलोऱ्याच्या अवस्थेत गाळून पडलाय, तर आंबे बहरात आलेले गुंडी अवस्थेतील फळाना ही गळती लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

Dharavi Leptospirosis : पावसाळ्यामध्ये धारावीत जीवघेणा लेप्टोस्पायरोसिस पसरण्याची भीती, आकडेवारी काय सांगते?

नक्की वाचा - Dharavi Leptospirosis : पावसाळ्यामध्ये धारावीत जीवघेणा लेप्टोस्पायरोसिस पसरण्याची भीती, आकडेवारी काय सांगते?

गतावर्षी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मोसंबी बागांवर खत, कीड नियंत्रण, ठिबक सिंचन यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला आहे.त्यांतच गतवर्षी दर कोसळल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. ह्या अडचणी वर मात करत अंबे आणि मृग बहरावर मोठ्या आशा असताना या मृग आणि आंबे बहरावर ही अवकाळी आणि हवामान बदलाच संकट ओढवल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटात आणखीच भर पडलीय.मोसंबीला वर्षभरामध्ये जून ते जुलैमध्ये मृग बहार येतो.तर जानेवारी - फेब्रुवारीमध्ये अंबे बहार फुटतो असतो.कधी-कधी जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्यास मोसंबीच्या झाडावर अडकण बहर येतो.मात्र विश्वासाचा बहर समजल्या जाणारा आंबे बहर वारंवार तीनदा संकटात सापडल्याने  शेतकरी मृग बहाराकडेही वळले होते.या वर्षी मात्र दोन्ही बहर मान्सूनपूर्व अवकाळी वादळी वऱ्यांसह झालेल्या वातावरणात अचानक बदल झाल्याने फुलोऱ्या आणि गुंडी अवस्थेत गळून पडल्याने मोसंबी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालीय.

त्यामुळे कधी दुष्काळ,कधी अवकाळी संकट,मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचीला पुंजल काय असा प्रश्न या संकटामुळे शेतकऱ्यावर निर्माण झालाय. सरकारने तात्काळ पंचनामे करवून फळपीक विम्या द्यावा,नुकसान अनुदान द्यावं अशी मागणी मोसंबी उत्पादक शेतकऱ्याकडून केल्या जातं आहे...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com