
नाशिक: सात महिन्यांपासून टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकल्याने नाशिकमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांनी नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमधील बाजार समितीत ठिय्या आंदोलन सुरु केले. पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करत बाजार समिती प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा लिलावही बंद झाल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे सात महिन्यांपासून अडीच कोटी रुपयांची थकबाकी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत सुरू केले ठिय्या आंदोलन सुरू करीत बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात दिल्या. जोरदार घोषणा करण्यात आली. पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याने निर्माण झाला तणाव निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालं होतं त्यामुळे हिंगोलीच्या बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे.. परिणामी बाजारातील भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.. पंधरा ते वीस दिवसापूर्वी वीस तीस रुपये किलो दराने मिळणारा भाजीपाला आता 50 ते 60 रुपये किलो प्रमाणे ग्राहकांना विकत घ्यावा लागत आहे.. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचं नुकसान जरी झाल असलं तरी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे..
(नक्की वाचा : आयपीएल 2025 चा फायनल एकदम खास! 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world