जाहिरात

CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं

CM  Fadnavis  on Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं
CM  Fadnavis  on Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई:

CM  Fadnavis  on Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेनं 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा  काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. या मोर्च्यात उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार होते. पण, राज्य सरकारनं रविवारी (29 जून) हा अध्यादेश रद्द केला. त्यामुळे हा मोर्चा आता होणार नाही. पण, त्यानंतरही आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी (30 जून) अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चव्हाण यांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मु्ख्यमंत्र्यांनी या विषयावर जाहीर मत व्यक्त केलं.

पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्ती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी झाला होता. त्यामुळे राज ठाकरेंनी हा प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारावा असं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं. त्याचबरोबर दोन भाऊ एकत्र यावेत की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी याबाबत काही अध्यादेश (GR) काढलेला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

ठाकरे बंधुंनी खुशाल एकत्र यावं, त्यांनी एकत्र क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावं, फुटबॉल खेळावा, स्विमिंग करावं, जेवण करावं आपली काहीही हरकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Bharat Gogawale: 'नारायण राणेंनी मर्डर केले' राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब )
 

 ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये अहवाल

यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना पहिलीपासूच्या हिंदी सक्तीचा अहवाल हा ठाकरे सरकारनं स्वीकारला होता, याची आठवण करुन दिली होती. झोपलेल्या लोकांना उठवता येतं. पण सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना समिती स्थापन केली. त्यांच्याच काळात हिंदी सक्तीचा जीआर निघाला होता असं फडणवीस, यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : Dombivli News : ऐन पावसाळ्यात डोंबिवलीकर होणार बेघर, 'ती' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश )
 

रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन करण्यात आली होती.  14 सप्टेंबर 2021 ला या समितीने अहवाल सादर केला. हा अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता. त्या रिपोर्टमध्ये हिंदी पहिली पासून सक्तीची करावी असं सुचवलं होतं, हा इतिहास मुख्यमंत्र्यांनी सांगितला होता. त्याचबरोबर याबाबत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारावा असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com