जाहिरात

Sharad Pawar:'गेले त्यांची चिंता करू नका, संधीसाधूंना कधीच बरोबर घेणार नाही' पवारांनी ठणकावले

पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा. निवडणुकीची काळजी करू नका. सगळ्या जागा आपण लढवू असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar:'गेले त्यांची चिंता करू नका, संधीसाधूंना कधीच बरोबर घेणार नाही' पवारांनी ठणकावले
पुणे:

Sharad Pawar NCP News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस  एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या. यावर आता खुद्द शरद पवारांनीच वक्तव्य करत सर्वांनाच कोड्यात टाकलं आहे. काही दिवसापूर्वी शरद पवारांनी भाजप सोडून कोणा बरोबर ही आघाडी करण्यास तयार आहोत असं वक्तव्य केलं होतं. पण आता पवारांनी वेगळचं वक्तव्य केलं आहे. संधीसाधूना आपण कधीच बरोबर घेणार नाही, किंवा त्यांच्या बरोबर जाणार ही नाही असं स्पष्ट करत, एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर ही पूर्ण विराम दिला आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही, असं पवार म्हणाले. सगळ्यांना बरोबर घ्यायचा असा सूर आहे. त्यात काही गैर नाही. पण कोणाला बरोबर घ्यायचे हा प्रश्न आहे. गांधी नेहरू हा काँग्रेसचा विचार आहे. त्या विचाराच्या लोकांना आपण  बरोबर घेऊ, पण भाजपचा तो विचार नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे शरद पवारांनी भाजप बरोबर जाण्याचा प्रश्नही या निमित्ताने मार्गी लावला आहे. संधीसाधू पणा राजकारण करू नका. सगळ्यांना बरोबर घेता येतील.पण सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको बिल्कूल नको असं म्हणत त्यांनी अजित पवारांनाही झिडकारले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'बायकोला गळ्यातील पोत घ्यायचीये', 93 वर्षांच्या वृद्धाने पिशवीत हात घातला अन्...; अंगावर काटा आणणारा Viral Video

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंगही शरद पवारांनी या निमित्तांनी फुंकले आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर  राष्ट्रवादी काँग्रेस सारखे संघटन हवे आहे. त्यासाठी महापालिका निवडणूकीत नवीन नेतृत्व तयार करायचे आहे. आपल्याला विकास करायचा आहे. त्यासाठी संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. जे सोडून गेले त्यांची चिंता करू नका असं पवारा म्हणाले. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेत. 1978 मध्ये मला अनेक आमदार सोडून गेले. मी चिंता केली नाही. पुन्हा मी पक्ष उभा केला. कोणी सोडून गेले याची चिंता करू नका. जनता सुज्ञ आहे. लोकशाही त्यांच्या मुळे जिवंत आहे. असं पून्हा एकदा कार्यकर्त्यांना सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा. निवडणुकीची काळजी करू नका. सगळ्या जागा आपण लढवू. आपल्या सोबत जो कोणी येत असले त्याचं स्वागत आहे. जास्तीत जास्त नवीन नेतृत्वाला संधी देऊ. महिलांसह तरुणांना संधी दिली जाईल. असं ही ते म्हणाले. ज्यांनी शहराच्या वाटण्या केल्या, राजकारणात नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना दूर करू असा पण ही त्यांनी केला. नदी सुधार प्रकल्पा प्रमाणे इथलं नेतृत्व देखील स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. असं ते या निमित्ताने म्हणाले. महापालिका निवडणुकी साठी सज्ज राहण्याच्या पवारांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना यावेळी केल्या. शिवाय पवारांनी आता निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल ही त्यांनी वाढवले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com