
Rahul Dravid on Bengaluru Stampede : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि हेड कोच राहुल द्रविडने 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ ( M Chinnaswamy Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) आयपीएल 2025 च्या विजेतेपदाच्या सेलिब्रेशनवेळी झालेल्या चेंगराचेंगरीवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आरसीबीने तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 3 जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जला फायनलमध्ये 6 रन्सनं पराभूत करत अखेर आयपीएल विजेतेपद पटकावलं. विजेतेपदाचा आनंद फॅन्ससोबत साजरा करण्यासाठी फ्रँचायझीने बंगळुरूमध्ये सेलिब्रेशन केलं, परंतु यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल द्रविड हा बंगळुरु आणि कर्नाटकमधील प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्यानं या विषयावर NDTV कडं पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. बंगळुरुसारख्या शहरात अशी शोकांतिका घडताना पाहून खूप दु:ख झालं, असं द्रविडनं कबुल केलं.
काय म्हणाला द्रविड?
राहुलनं या विषयावर NDTV शी बोलताना सांगितलं की, ' हे खूप निराशाजनक आहे. हे खूप दुःखद आहे. बंगळुरू हे खेळावर प्रेम करणारे शहर आहे. मी इथलाच आहे. इथल्या लोकांना फक्त क्रिकेटच नाही, तर सर्वच खेळ आवडतात. ते सर्व खेळांचे आणि सर्वच खेळाडू फॉलो करतात. मग तो फुटबॉल संघ असो किंवा कबड्डी टीम. अशी दुर्दैवी घटना घडली हे खरोखरच हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले आणि जे जखमी झाले, त्या सर्वांप्रती आमच्या संवेदना आहे. या प्रकारची शोकांतिका घडायला नको होती.
( नक्की वाचा : बॉसच्या मागं लागून सुट्टी घेतली, लॅपटॉप टेबलवर ठेवून स्टेडियमकडे पळाली, विराटची जबरी फॅन परतलीच नाही! )
मात्र, द्रविडनं यावेळी बोलताना 'राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर' बोलणे टाळले. त्याचबरोबर या दुर्घटनेसाठी राज्य सरकारला, फ्रँचायझीला किंवा कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या लोकांना दोष देण्यासही त्यांनी नकार दिला.
या प्रकरणाच्या तपासासंदर्भात आरसीबीचे काही अधिकारी आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे, तसेच आयपीएल फ्रँचायझीविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world