जाहिरात

T20 वर्ल्ड कप जिंकला तरी Gautam Gambhir संतापलेलाच? म्हणाला, 'त्या' 30 लोकांशिवाय मला कोणाचं देणंघेणं नाही!

Gautam Gambhir Press Conference:: या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सोशल मीडियावरील टीकेला आणि चर्चेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

T20 वर्ल्ड कप जिंकला तरी Gautam Gambhir संतापलेलाच? म्हणाला, 'त्या' 30 लोकांशिवाय मला कोणाचं देणंघेणं नाही!
Gautam Gambhir Press Conference: गौतम गंभीरनं टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे,
मुंबई:

IND vs NZ T20 World Cup Final 2026:  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रनने पराभव करत T20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद आपल्या नावावर केले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने सोशल मीडियावरील टीकेला आणि चर्चेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा हे जेतेपद पटकावून इतिहास रचला असून, या यशानंतर गंभीरने ड्रेसिंग रूममधील वातावरणावर भाष्य केले आहे.

गौतम गंभीरचे सोशल मीडियाला चोख प्रत्युत्तर

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना गौतम गंभीरने स्पष्ट केले की, तो सोशल मीडियावरील लोकांसाठी उत्तरदायी नाही. गंभीर म्हणाला की, माझे उत्तरदायित्व सोशल मीडियावरील लोकांसाठी नसून त्या ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या 30 लोकांसाठी आहे.

एक प्रशिक्षक तितकाच चांगला असतो जितका त्याचा संघ असतो. खेळाडूंनीच त्याला आज जो तो आहे, तो प्रशिक्षक बनवले आहे, असेही त्याने आवर्जून सांगितले. सोशल मीडियावरील चर्चांपेक्षा संघातील खेळाडूंचा विश्वास संपादन करणे त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे यातून दिसून येते.

( नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )

वैयक्तिक विक्रमांपेक्षा ट्रॉफीला महत्त्व

भारतीय क्रिकेटमध्ये अनेकदा वैयक्तिक टप्प्यांची किंवा रेकॉर्ड्सची चर्चा केली जाते, मात्र गंभीरने या जुन्या परंपरेला छेद दिला आहे. त्याचे साधे तत्वज्ञान आहे की मैलाचे दगड किंवा वैयक्तिक रेकॉर्ड्सना महत्त्व नाही, तर हातात येणारी ट्रॉफी महत्त्वाची आहे. 

भारतीय क्रिकेटमध्ये बराच काळ वैयक्तिक कामगिरीवर चर्चा झाली आहे, पण  तो प्रशिक्षक पदावर आहे, तोपर्यंत वैयक्तिक विक्रमांवर चर्चा होणार नाही, अशी आशाही त्याने व्यक्त केली. संघाची संस्कृती ही केवळ विजयासाठी आणि ट्रॉफीसाठी असावी यावर त्याचा भर आहे.

( नक्की वाचा : IND vs NZ : निर्णय चुकला, नशीब फिरलं! वाचा टॉस जिंकूनही सँटनरने कसं सोपवलं भारताच्या हाती सोपवलं विजेतेपद )

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाचे कौतुक

गंभीरने टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव याचे भरभरून कौतुक केले. सूर्याने या फॉरमॅटमध्ये त्याचे काम खूप सोपे केले असल्याचे तो म्हणाला. सूर्या हा एक विलक्षण नेता आहे आणि त्याने स्वतःला केवळ कॅप्टन न म्हणता लीडर मानले आहे, ही बाब गंभीरला महत्त्वाची वाटते. 

ड्रेसिंग रूममध्ये कॅप्टनपेक्षा लीडर ही संकल्पना मोठी असते, असे गंभीरने स्पष्ट केले. सुदैवाने सूर्या आणि त्याचे विचार एकाच पातळीवर असल्याने संघाची एक मजबूत संस्कृती तयार करण्यास मदत झाली आहे.

( नक्की वाचा : संजू, इशान अन् बुमराह... ही नावं आता विसरता येणार नाहीत! भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'हे' आहेत खरे हिरो )

ऐतिहासिक विजयाची नोंद

या विजयासह भारतीय संघ T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात तीन वेळा विजेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. इतकेच नाही तर आपले विजेतेपद राखणारा म्हणजेच सलग दोनदा वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा क्रिकेट विश्वातील पहिला देश बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये भारतीय खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत दिमाखात जेतेपद पटकावले. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने रचलेला हा विक्रम क्रिकेट विश्वात दीर्घकाळ लक्षात राहणारा ठरेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com