
भारतीय क्रिकेट टीम (Team India) पाच टेस्टच्या सीरिजसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही देशांमधील पहिली टेस्ट 20 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या टप्प्याची टीम इंडिया सुरुवात करेल. भारतीय टीम इंग्लंडमध्ये दाखल झालीय. पण, चर्चा अद्यापही विराट कोहलीची (Virat Kohli) आहे. विराटनं गेल्या महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे
गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या आगामी सीरिजसाठी टीम निवडीच्या काही दिवसांपूर्वी विराटने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 36 वर्षीय विराटने 123 सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9,230 रन्स करून या फॉरमॅटमधून निरोप घेतला. विराटची ही घोषणा अनेकांसाठी धक्कादायक होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलियाने 2015 साली जिंकलेल्या वन-डे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन मायकल क्लार्कनं (Former Australia captain Michael Clarke) विराट ही निवृत्ती मागे घेऊ शकतो, असं मतं व्यक्त केलं आहे. क्लार्क म्हणाला की, मला यावर विश्वास आहे की, टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 5-0 नं पराभव सहन करावा लागला तर फॅन्स विराट कोहलीने निवृत्तीतून बाहेर येऊन पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळावे अशी मागणी करतील
प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला वाटते की जर त्याला कॅप्टन, निवड समितीच्या सदस्यांनी विचारले आणि फॅन्सनं पाठिंबा दिला, जर त्यांना (टीम इंडिया) इंग्लंडमध्ये मोठ्या फरकाने हरवले, तर मला वाटते तो परत येईल. त्याला अजूनही टेस्ट क्रिकेट आवडते.' असे क्लार्कने बियॉन्ड23 पॉडकास्टवर सांगितले.
( नक्की वाचा : Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले )
विराटकडे टेस्ट क्रिकेटला देण्यासारखे अद्याप बरेच आहे. त्याची अनुपस्थिती टीम इंडियाला इंग्लंडमध्ये जाणवू शकत्े, असं क्लार्कनं सांगितलं.
क्लार्क पुढे म्हणाला की, 'तो टेस्ट क्रिकेटला सर्वोच्च दर्जा मानतो. तो अजूनही चांगला क्रिकेट खेळत आहे. त्याने निश्चितपणे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्याची काहीही कारणे असली तरी, प्रत्येकाच्या कारकिर्दीत अशी वेळ येते. जर असे असेल, तर ठीक आहे. पण त्यांनी चांगली कामगिरी केली नाही, जर ते हरले, जसे मी म्हणतो, इंग्लंडमध्ये 5-0, जे मला वाटत नाही की ते होईल. मला वाटते की ते विराट कोहली आणि रोहित शर्माशिवायही इंग्लंडमध्ये जिंकू शकतात. मला वाटते हा भारतीय संघ एक चांगला संघ आहे," तो पुढे म्हणाला.
'भारत हा एक क्रिकेटप्रेमी देश आहे. त्यांना त्यांच्या टीमला जिंकताना पाहायचे आहे. मला वाटते की ते अजूनही इंग्लंडला हरवू शकतात. हे पहा. मला वाटते की ती एक चांगली टूम आहे. पण जर त्यांनी चांगली कामगिरी केली नाही, जर त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला, तर मला वाटते की विराट कोहलीला निवृत्तीतून बाहेर येण्यासाठी दबाव येईल,' असे क्लार्कने स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world