बीडच्या आष्टी तालुक्यातील दोन तांड्यांमधून पंधरा बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. यात नऊ मुली आणि सहा मुलांचा समावेश आहे. या मुलांकडून गेल्या काही वर्षांपासून जनावरांची राखण, धुणी भांडी आणि घरगुती कामं जबरदस्तीने करून घेतली जात होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार समोर आला आणि त्याच नंतर सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाई नंतर पंधरा बालकांना सेवाश्रमात ठेवण्यात आलंय.