महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धाच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील महत्त्वाच्या खात्यांचा पदभार हा आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.