पुणे बलात्कार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यभरात गदारोळ माजला आहे. विरोधक यावरुन सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कदम यांना अशा प्रकरणात व्यक्त होताना संवेदनशीलपणे व्यक्त होण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. योगेश कदम हे नवीन आहेत, त्यांचं म्हणणं हे वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं असंही फडणवीस म्हणाले.