Pakistan News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल 'वॉटर स्ट्राइक'ची रणनीती स्वीकारली. यामुळे पाकिस्तानमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. भारताने झेलम नदीवरील मंगला आणि सिंधूवरील तारबेला या दोन प्रमुख धरणांमधील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात कमी केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. नदीच्या प्रवाहात अचानक घट झाल्यामुळे पाकिस्तानातील खरीप पेरणीचा हंगाम संकटात सापडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शेतीवर खोलवर परिणाम होत आहे. जिथे चिनाब नदीला लाईफलाईन मानले जाते. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर हे पाऊल पाकिस्तानसाठी दुहेरी धक्का ठरत आहे. चिनाब नदीचे अप्पर चिनाब आणि बीआरबी (बंबावली-रवी-बेडियान) सारखे कालवे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हजारो एकर शेतीला सिंचन करतात. या प्रदेशातील अन्नसुरक्षा आणि उपजीविकेचा आधार हा पाण्याचा स्थिर पुरवठा आहे. पण आता पाण्याच्या प्रवाहात झालेल्या कमतरतेमुळे पीक उत्पादनावर धोका निर्माण झाला आहे.
(नक्की वाचा- ST White paper : एसटी महामंडळाकडून 8 दिवसात काढली जाणार श्वेतपत्रिका)
या भागात गहू, कापूस, ऊस आणि तांदूळ ही प्रमुख पिके घेतली जातात, ज्यांसाठी सतत पाणीपुरवठा अत्यंत आवश्यक आहे. जर चिनाब नदीचे पाणी पाकिस्तानसाठी असेच अडवले गेले तर त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या पीक उत्पादनावर होईल. आधीच आर्थिक मंदी आणि महागाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी लोकांसाठी हे नवं संकट ठरु शकते.
(नक्की वाचा- - Political News: सुप्रिम कोर्टाचा दणका! 'ते' दोन टेंडर झाले रद्द, शिंदेंचे टेन्शन वाढणार?)
सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण (IRSA) सल्लागार समितीनुसार, खरीप हंगामात सिंचनासाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्यात सुमारे 21 टक्के कपात होऊ शकते. हंगामाच्या सुरुवातीला, जेव्हा पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते, तेव्हा ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. पाणी संकटाच्या या संभाव्य परिणामामुळे पाकिस्तान आणखी संकटात सापडू शकतो. पाकिस्तान आधीच महागाई आणि आर्थिक दबावाशी झुंजत आहे. जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर त्याचा देशातील अन्न उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो.