
विशाल पाटील, मुंबई
ST Bus : राज्याच्या गावखेड्यांची लाईफलाईन असलेली एसटी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. राज्यभर नेटवर्क असलेल्या एसटीची अवस्थी तिला साजेशी अशी नाही. सातत्याने होणार तोटा आणि त्यातून कर्मचाऱ्यांना बसणारा फटका हे ठरलेलं आहे. मात्र या मागील कारणे आता समोर येण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्य परिवहन महामंडळाकडून लवकरच श्वेतपत्रिक काढली जाणार आहे. पहिल्यांदा अशा प्रकारे श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. एसटी महामंडळाची स्थिती , तोटा आणि होणारे नुकसान कशामुळे याचा खुलासा या श्वेतपत्रिकेतून होण्याची शक्यता आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वत: ही श्वेतपत्रिका सादर करणार आहेत. येत्या 8 दिवसात राज्यासमोर एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका येणार आहे. यामुळे नेमकं श्वेतपत्रिकेत काय येणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
श्वेतपत्रिका का गरजेची?
सुमारे 10 हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते. कर्मचाऱ्यांचे देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी या साठी महामंडळाला पैशाची गरज आहे.
याबरोबरच महामंडळाला इंधन,वस्तू व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते? किती खर्च येतो? तसेच किती देणी बाकी आहेत. या सर्वांचा लेखा-जोखा श्वेतपत्रिकेतून समोर येऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world