
Political News : राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांचा समावेश करून जवळपास चार महिने पूर्ण होत आहेत. पण अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकाऱ्याचा वाटप झालेलें नाही. फडणवीस-शिंदे-पवार महायुती सरकार आल्यानंतर नागपूर अधिवेशनात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. या विस्तारामध्ये राज्यमंत्री यांच्या नियुक्ती केल्या गेल्या होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूर अधिवेशन कोणत्याही मंत्र्यांना विभागाशिवाय कामकाज करावा लागलं होतं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना विभागाचे वाटप करण्यात आलं होतं. कॅबिनेट मंत्र्यांनी अद्यापही त्यांच्या खात्याच्या राज्यमंत्र्यांना अधिकार न दिल्याने राज्यमंत्र्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे.
(नक्की वाचा- ST White paper : एसटी महामंडळाकडून 8 दिवसात काढली जाणार श्वेतपत्रिका)
राज्यमंत्री यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सांगितले. मात्र अद्याप याबाबत काहीच होत नसल्याने राज्यमंत्री हे अधिकाराविना आहेत, अशी परिस्थिती आहे. कॅबिनेट मंत्र्यांना स्वतःकडेच सर्व कारभार आणि अधिकार ठेवायचे आहेत, यामुळे राज्य मंत्र्यांमध्ये अस्वस्थता अधिक आहे.
राज्यमंत्री यांच्याकडे प्रशासकीय कोणत्याही फाईल अद्याप जात नाहीत. तसेच अधिकार वाटप देखील झालेले नाही. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याचे फक्त अधिकार राज्यमंत्र्यांना दिले आहेत. इतर कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकाराचं वाटप राज्यमंत्र्यांना केलेले नाही.
(नक्की वाचा- - Political News: सुप्रिम कोर्टाचा दणका! 'ते' दोन टेंडर झाले रद्द, शिंदेंचे टेन्शन वाढणार?)
नागपूर अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन अशी दोन अधिवेशने होऊन गेली. आता पावसाळी अधिवेशन पुढील काही दिवसात येत आहे. आता तरी किमान राज्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world