जाहिरात

Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका

Lenskart Product Head Rahul Rupani LinkedIn Post : लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड राहुल रुपानी यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये बीकेसी परिसरातील रिक्षावाले रिक्षा न चालवता महिन्याला 5-8 लाख रुपये कमावत असल्याचे म्हटले होते.

Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका
राहुल रुपानी यांनी रिक्षावाल्याचा फोटो पोस्ट करताना त्याबद्दलची माहिती दिली होती
मुंबई:

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील (BKC) अमेरिकेच्या दूतावासाबाहेर काही रिक्षावाले उभे असतात. या रिक्षावाल्यांची महिन्याला कमाई 5-8 लाख रुपये आहे. रिक्षा न चालवता हे रिक्षावाले पैसा कसा कमावतात हे लेन्सकार्टचे प्रॉडक्ट हेड राहुल रुपानी यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली.  हे रिक्षावाले वैध कोणालाही न फसवता पैसे कमावत होते, मात्र या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे त्यांना दणका बसला आहे. 

नक्की वाचा : मुंबईतील रिक्षावाला कमावतोय 5 ते 8 लाख रुपये; तेही रिक्षा न चालवता

दूतावास परिसरातील सुरक्षेला प्राधान्य

अमेरिकी दूतावासाचा (US consulate mumbai) परीसर हा अतिसंवेदनशील परीसर मानला जातो. इथली सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत कडक असते. नेमून दिलेल्या पार्किंगशिवाय काऊन्सुलेटच्या आसपास गाडी पार्क करण्यास मनाई आहे. अमेरिकी दूतावासामध्ये जात असताना बॅग आत नेण्यास मनाई करण्यात येते. अनेकांना याबाबत माहिती नसते, बॅग ठेवायची कुठे असा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. ही समस्या ओळखून इथल्या काही रिक्षावाल्यांनी 1 हजार रुपयाच्या बदल्यात तुमचा ऐवज आम्ही सुरक्षित ठेवू असं म्हणत रिक्षामध्ये बॅगा ठेवण्यास सुरुवात केली होती. दूतावासामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे या रिक्षावाल्यांचा व्यवसाय जोरात सुरू होता. रुपानी हे स्वत: दूतावासामध्ये गेले असताना त्यांनीही त्यांची बॅग एका रिक्षावाल्याकडे ठेवली होती. त्यामुळे त्यांना या सगळ्याची माहिती मिळाली होती. 

नक्की वाचा : 'मिठी'वरून 'कटू' संघर्ष, तपासामुळे नालेसफाईची कामे रखडत असल्याचा पालिका प्रशासनाचा आरोप

व्हायरल पोस्टमुळे पोलीस झाले सतर्क

रुपानी यांच्या पोस्टने या रिक्षावाल्यांना प्रसिद्धी मिळाली खरी, मात्र ही गोष्ट पोलिसांच्याही निदर्शनास आली. दूतावास परिसरात रिक्षासह कोणतेही वाहन उभे करता येणार नाही अशी तंबी पोलिसांनी हा व्यवसाय करणाऱ्या रिक्षावाल्यांना दिली आहे. दूतावासामध्ये येणाऱ्यांकडील वस्तू अशा पद्धतीने आपल्याकडे ठेवून घेण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे. दूतावासात येणाऱ्या माणसाने बॅगेतून काय आणलं आहे याबद्दल माहिती नसते, जर त्याने ती बॅग रिक्षावाल्याला दिली आणि त्यामुळे काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ठरेल ?असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या रिक्षावाल्यांना चाप लावला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com