जाहिरात

Mumbai Metro 3 : मुंबईच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अक्षरश: तळं; पण इतकं पाणी आलं कुठून? प्रशासनानेच सांगितलं कारण

मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला या पावसाचा फटका बसला आहे. 16 दिवसांपूर्वीच या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

Mumbai Metro 3 : मुंबईच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अक्षरश: तळं; पण इतकं पाणी आलं कुठून? प्रशासनानेच सांगितलं कारण

मुंबईत रात्रभरापासून पावसाचा जोर सुरूच आहे. हवामान विभागाकडून मुंबई-ठाण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला पावसाचा नाहक त्रास सहन करावा लागला. याचा फटका मुंबई लोकल आणि रस्ते वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळालं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला या पावसाचा फटका बसला आहे. 16 दिवसांपूर्वीच या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मुंबई मेट्रो तीन प्रकल्प पहिल्याच पावसात पाण्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान अचानक मेट्रोमध्ये पाणी कसं आलं असा सवाल प्रवाशांकडूनही उपस्थित केला जात आहे. मुंबईच्या या भूमिगत मेट्रोमध्ये पाणी कसं आणि कुठून आलं याबाबतही प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mumbai Rain: 'महाभ्रष्ट  महायुतीने मुंबई डुबवली...', काँग्रेस- ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र

नक्की वाचा - Mumbai Rain: 'महाभ्रष्ट महायुतीने मुंबई डुबवली...', काँग्रेस- ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र

मेट्रो-3 चे स्पष्टीकरण...

मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू होतं. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने येथे उभारण्यात आलेली तात्पुरती संरक्षक भिंत पडली. 

मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबवली...
खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. मेट्रो-3 चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असंही मेट्रोकडून सांगण्यात आलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com