
मुंबईत ॲप-आधारित टॅक्सी सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना तात्काळ काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे मूळ भाडे स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना प्रति किलोमीटर सुमारे 5 रुपये अधिक मोजावे लागतील.
यापूर्वी ॲप-आधारित टॅक्सींचे मूळ भाडे सुमारे 15 ते 16 रुपये प्रति किलोमीटर होते, जे आता वाढून 20.66 रुपये (नॉन-एसी) आणि 22.72 रुपये (एसी) झाले आहे. हा बदल तात्पुरता असून, जोपर्यंत सरकार ॲप-आधारित टॅक्सींसाठी स्वतंत्र भाडे दर निश्चित करत नाही, तोपर्यंत हेच दर लागू राहतील.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे हायवेवर कशी होतेय फसवणूक? हा Insta Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
भाडेवाढ आणि नियम काय आहेत?
- मूळ भाडे: नॉन-एसी टॅक्सीसाठी प्रति किलोमीटर 20.66 रुपये, तर एसी टॅक्सीसाठी 22.72 रुपये.
- सवलत: मागणी कमी असताना मूळ भाड्यावर 25% पर्यंत सूट देता येईल.
- सर्किट प्राइसिंग : जास्त मागणीच्या वेळी मूळ भाड्याच्या 1.5 पट अधिक भाडे आकारण्याची परवानगी आहे. यामुळे, जास्त गर्दीच्या वेळी भाडे प्रति किलोमीटर 34 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
- चालकाचा वाटा: या निर्णयानुसार, चालकांना एकूण भाड्याचा 80% वाटा मिळेल, तर कंपनीला 20% वाटा मिळेल.
(नक्की वाचा- Thane Police Traffic Advisory: ठाणे शहरात नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद आणि पर्यायी मार्ग)
या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असला तरी, अनेक महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी करणाऱ्या टॅक्सी चालकांच्या संघटनांसाठी हा एक दिलासा आहे. सरकारने चालकांच्या आंदोलनाच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, बाईक टॅक्सींना परवाने देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेले टॅक्सी चालक मुंबईत आंदोलन करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world