Raj and Uddhav Thackeray : ठाकरे बंधुनी या 5 गोष्टीसाठी एकत्र यावं; मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पार्ले पंचमने मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधुनी एकत्र यावे या आशयाचे बॅनर्स लावले आहेत. राज आणि उद्धव यांना का एकत्र यावे, याची पाच कारणे पार्ले पंचमने दिली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या काळात एकत्र येणार का? हा सध्याच्या घडीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे आणि उद्धव उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्यास हरकत नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

राज्यातील अनेकजण, अनेक संस्था यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत असं वाटतं. पार्ले पंचम संस्था हे देखील त्यातील एक आहे. त्यामुळेच पार्ले पंचमने मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधुनी एकत्र यावे या आशयाचे बॅनर्स लावले आहेत. राज आणि उद्धव यांना का एकत्र यावे, याची पाच कारणे पार्ले पंचमने दिली आहेत.

(नक्की वाचा-  "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी)

पार्ले पंचमच्या बॅनरवर काय?

अभिनंदन ठाकरे बंधुनो! लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या.
1. मुंबईत मराठी माणूस अनाथ होत आहे, त्याला घर खरेदीत आरक्षण मिळवण्यासाठी ठाकरे बंधुनो एकत्र या.
2. मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे बंधुनो एकत्र या.
3. मराठी माणसांच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधुनो एकत्र या.
4. शिवरायांचा महाराष्ट्रधर्म टिकवण्यासाठी ठाकरे बंधुनो एकत्र या.
5. बटेंगे तो कटेंगे हे न विसरता ठाकरे बंधुनो एकत्र या.

मराठी माणूस आशेने बघतो आहे, ठाकरे बंधुनो!
एकत्र या, एकत्र या, एकत्र या.

(नक्की वाचा-  Raj Thackeray Interview : "आमच्यातील वाद किरकोळ", उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंंचं मोठं वक्तव्य)

काय म्हणाले होते राज ठाकरे? 

"महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यापुढे आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत", असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मात्र महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरला."  

Advertisement

Topics mentioned in this article