
KL Rahul vs Kumar Dharmasena Heated Talk Video Viral: भारत आणि इंग्लंडमधील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मैदानावरील वादविवादामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापासून सुरू झालेले छोटे छोटे वाद ओव्हलवरील शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंत सुरू आहेत. ओव्हलमध्येही आता अशीच वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल आणि श्रीलंकेचा पंच कुमार धर्मसेना यांच्यात जोरदार वाद झाला.
कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडिया 224 धावांवर ऑलआउट झाल्यानंतर, इंग्लंडने आपली फलंदाजी सुरू केली. त्यासाठी, बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी आक्रमक सुरुवात केली आणि 92 धावांची भागीदारी केली. दोघांनीही चौकार मारून भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. त्याचा परिणाम टीम इंडियावर बराच काळ दिसून आला आणि त्यामुळे वातावरण तापले.
IPL 2026: इंग्लंड गाजवणारा स्टार KKR च्या रडारवर, 'या' पद्धतीनं होणार समावेश?
इंग्लंडच्या डावातील 22 व्या षटकात मोठा वाद झाला. प्रसिद्ध कृष्णाच्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जो रूट फसला गेला. अशा परिस्थितीत, भारतीय वेगवान गोलंदाजाने जो रूटला काहीतरी सांगितले, ज्यावर रूटने सौम्यपणे उत्तर दिले. पण रूटने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारताच, प्रसिद्ध पुन्हा त्याला काहीतरी बोलू लागला आणि रूटला यावर राग आला. त्याने प्रसिद्धला रागाने उत्तर दिले आणि काहीतरी बोलला.
या वादात सामन्याच्या पंचांनीही उडी घेतली ज्यामुळे पंच आणि राहुल आमनेसामने आले. रूट आणि प्रसिद्ध यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढत असल्याचे पाहून, पंच धर्मसेना यांनी दोघांनाही थांबवले आणि भारतीय गोलंदाजाला असे करणे टाळण्याची सूचना केली. या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलला हे आवडले नाही आणि त्यांनी पंच धर्मसेना यांना टीम इंडियाने गप्प राहावे का? असा सवाल केला.
दोघांमध्ये काय संवाद झाला?
राहुल: तुम्हाला काय हवे आहे? आपण गप्प राहावे?
धर्मसेना: तुम्हाला एखादा गोलंदाज तुमच्याकडे येऊन काहीतरी बोलेल आवडेल का? नाही, तू असं करू नकोस.
राहुल: तुला आमच्याकडून काय हवंय? आपण फक्त फलंदाजी करावी, गोलंदाजी करावी आणि घरी जावे?
धर्मसेना: सामना संपल्यानंतर आपण यावर चर्चा करू. तू असं बोलू शकत नाहीस.
दरम्यान, पंच धर्मसेना भारतीय सलामीवीर केएल राहुलवर आणि गोलंदाजावर काही कारवाई करतील का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. क्रिकेटच्या कायद्यात हे स्पष्ट आहे की मैदानावर पंचांच्या निर्णयावर कोणताही प्रश्न उपस्थित करता येत नाही. तसेच, पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालता येत नाही. जर असे केले तर आरोपी खेळाडूला शिक्षा म्हणून दंड होऊ शकतो आणि त्याच्या नावावर डिमेरिट पॉइंट देखील जोडले जाऊ शकतात.
Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world