सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कंपन्यांच्या कार्यालयातील विश्रांती कक्षांचा (ब्रेक रूम) वापर एका विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातही अशाच स्वरूपाचा वाद निर्माण झाल्याने आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील काही प्रसिद्ध आयटी कंपन्यांच्या इमारतींमधील विश्रांती कक्षांचा वापर काही कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी केला जात आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: आधी अपहरण आता मारहाण! डोंबिवलीतील RPI नेत्यांचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला! प्रकरण काय? )
विशेष म्हणजे, ज्या वेळी हे धार्मिक विधी सुरू असतात, त्या काळात इतर कर्मचाऱ्यांना त्या कक्षात प्रवेश नाकारला जातो, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यालयातील सार्वजनिक सोयींचा असा वापर होत असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
संस्थात्मक शिस्तीचा भंग झाल्याचा आरोप
कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना समान हक्क आणि सुविधा मिळणे अपेक्षित असते. मात्र, एखाद्या विशिष्ट गटाकडून अशा प्रकारे जागा अडवून धरली जात असल्याने संस्थात्मक शिस्तीचा भंग होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. कार्यालयातील विश्रांतीसाठी असलेल्या जागांचा वापर केवळ त्याच कामासाठी व्हायला हवा, असे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. नाशिकच्या घटनेनंतर आयटी कंपन्यांमधील अंतर्गत हालचालींवर आता बारीक लक्ष ठेवले जात आहे.
( नक्की वाचा : नाशिकची 'ती' बडी कंपनी 'कॉर्पोरेट जिहाद' चा अड्डा ! मशिदीत ट्रेनिंग ते ऑफिसमध्ये बीफ, वाचा हादरवणारी माहिती )
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पोलिसांना पत्र
या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना या संदर्भात एक विशेष पत्र पाठवले आहे. हिंजवडीतील कंपन्यांमध्ये नेमका काय प्रकार सुरू आहे, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कार्यालयातील नियमावलीचे उल्लंघन करून अशा गोष्टी घडत असतील, तर त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
पुण्यातील आयटी क्षेत्र हे जागतिक स्तरावर ओळखले जाते. तिथे अशा प्रकारे धार्मिक कारणावरून वाद निर्माण होणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. नाशिकमध्ये अशाच प्रकारच्या तक्रारींनंतर मोठा वाद निर्माण झाला होता, त्याचाच संदर्भ आता या हिंजवडी प्रकरणाला जोडला जात आहे. आता पुणे पोलीस यावर काय तपास करतात आणि संबंधित कंपन्या यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world