
आकाश सावंत, बीड: आज वटपोर्णिमा. राज्यभरात वटपोर्णिमेचा सण साजरा होत असतानाच बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यात घडली आहे. विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला असून सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. वर्षा ओमप्रकाश लाखे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला ज्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
या घटनेने बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही आत्महत्या नसून माझ्या मुलीला मारुन टाकण्यात आलं आहे. तिला सासरच्यांकडून त्रास दिला जात होता. आई-बापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा. लग्नाला 10 वर्षे झाली होती. 6 वर्षांची मुलगी आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी आमची मागणी असल्याचे आईने म्हटले आहे.
(नक्की वाचा : Mumbai Local Train Accident : .... तर मुंब्रातील अपघात टळला असता, 'त्या' तक्रारीकडील दुर्लक्ष भोवलं? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world