जाहिरात

Big News! 300 कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई 

यानिमित्ताने पुन्हा एकदा टाटा ग्रुपच्या एअरलाइन्स कंपनीवरील आर्थिक संकट आणि व्यवस्थापनातील गोंधळ समोर आला आहे.

Big News! 300 कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई 
मुंबई:

एअर इंडिया एक्सप्रेसकडून सामूहिक रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने तब्बल 25 जणांचं निलंबन केलं आहे. 

8 मे रोजी एअर इंडिया एक्सप्रेसच्या तब्बल 300 कर्मचाऱ्यांनी अचानक आचारपणाचं कारण देत सामूहिक रजा घेतल्याचं समोर आल्यानंतर एअरलाइन्स क्षेत्रात खळबळ उडाली होती. यानिमित्ताने पुन्हा एकदा टाटा ग्रुपच्या एअरलाइन्स कंपनीवरील आर्थिक संकट आणि व्यवस्थापनातील गोंधळ समोर आला आहे. कर्मचाऱ्यांनी अचानक घेतलेल्या सामूहिक रजेमुळे कंपनीचा गोंधळ उडाला होता. त्यानंतर कंपनीने उड्डाणांची संख्या कमी करणे आणि 86   उड्डाणं रद्द करण्याचं जाहीर केलं होतं. यानंतर आज एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने सामूहिक रजेवर गेलेल्या 30 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. येत्या काळात निलंबनाच्या कारवाईत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बातमी अपडेट होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
पाकिस्तान सैन्याची सार्वजनिक कबुली, 25 वर्षांनंतर कारगिल युद्धातील सहभाग मान्य
Big News! 300 कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई 
MLA disqualification case hearing in Supreme court Uddhav Thackeray also in Delhi Big events in the delhi today
Next Article
आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, उद्धव ठाकरेही दिल्लीत; आज राजधानीत मोठ्या घडामोडी