जाहिरात

Chandra Grahan 2025: अयोध्येत रामलल्लाचं दर्शन बंद! 9 तास दर्शन थांबवलं, यंदाचं चंद्रग्रहण किती गंभीर?

Ayodhya Ram Lalla darshan : चंद्रग्रहणामुळे अयोध्येतील सर्व प्रमुख मंदिरांची दारं बंद करण्यात आली आहेत. कधीपासून मंदिर सुरू होणार?

Chandra Grahan 2025: अयोध्येत रामलल्लाचं दर्शन बंद! 9 तास दर्शन थांबवलं, यंदाचं चंद्रग्रहण किती गंभीर?
चंद्रग्रहणामुळे अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचं दार बंद करण्यात येणार आहे
अयोध्या:

Ayodhya Ram Lalla darshan closed for 9 hours : 7 सप्टेंबर, रविवारी चंद्रग्रहण (Purnima Lunar Eclipse) असल्याने अयोध्येत रामलल्ला आणि अन्य प्रमुख मंदिरांमध्ये 9 तासांपर्यंत दर्शन बंद असेल. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भक्तांना या वेळेत अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे.  ज्योतिषीय मान्यनेनुसार, चंद्र ग्रहणापासून नऊ तास सूतक काळ सुरू होईल, जो अशुभ मानला जातो.  (Chandra Grahan Time) हा सूतक काळ 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. ज्यामुळे अयोध्येतील सर्व प्रमुख मंदिरांची दारं बंद असतील. 

मंगल आरतीसह मंदिरांची दार उघडली जातील

सूतक काळ 9 तासांपूर्वी म्हणजे आज (7 सप्टेंबर) दुपारी 12:57 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण रात्री 9:58 वाजता सुरू होईल 8 सप्टेंबरला 01:26 (AM) वाजता संपेल. त्यामुळे रविवारी रामलल्लाचं दर्शन होणार नाही. सूतक काळ संपल्यानंतर सोमवारी सकाळी मंगळ आरती करीत मंदिराचं दार उघडलं जाईल. त्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेऊ शकाल. 

धार्मिक मान्यतेनुसार, सूतक काळादरम्यान लहान मुलं आणि वृद्धांना सोडून कोणालाही जेवणाची परवानगी नसते. याकाळात देवाचं भजन-कीर्तन, मंत्रजप आणि ध्यान करण्यासाठी शुभ कालावधी मानला जातो.   

यंदा चंद्रग्रहण रात्री 9.58 मिनिटांनी सुरू होईल आणि 8 सप्टेंबरला रात्री 1.29 मिनिटांनी संपेल. चंद्र संपूर्णपणे पृथ्वीच्या छायेखाली येईल. ज्याला ब्लड मून म्हटलं जातं. या काळात चंद्र हलक्या लाल रंगाचा असेल. हा ग्रहण कालावधी 3 तास 28 मिनिटांपर्यंत चालेल आणि भारतात सर्व भागात सहजपणे पाहता येईल. 

Chandra Grahan 2025: चंद्र ग्रहणाचा तुमच्या राशीवर होणार हे परिणाम? दुष्परिणाम टाळण्यासाठी जाणून घ्या महाउपाय

नक्की वाचा - Chandra Grahan 2025: चंद्र ग्रहणाचा तुमच्या राशीवर होणार हे परिणाम? दुष्परिणाम टाळण्यासाठी जाणून घ्या महाउपाय

चंद्र ग्रहणाचा जगावर कसा असेल प्रभाव 
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ग्रहणाचा प्रभाव केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर पाहायला मिळणार आहे. यावेळेस चंद्र कुंभ राशीमध्ये असल्याने विष योग निर्माण होत असून राहु ग्रहासह युती करत आहे. यामुळे मोठ्या शक्तींमध्ये संघर्ष, लोकांच्या नात्यांमध्ये तणाव आणि मानसिक त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे मानव आणि प्राण्यांमध्ये काही प्रकारचे संसर्गजन्य रोग तसेच पाण्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या ग्रहणाचा भारतीय राजकारणावरही खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे चंद्रग्रहण येत्या निवडणुकीत सत्ता परिवर्तनाचे कारण देखील बनू शकते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com