Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर फिल्ममेकर बेपत्ता; कुटुंबीयांकडून शोध सुरू

Air India Plane Crash : गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान एआय-171 मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात विमानातील 242 जणांपैकी 241 जणांचा आणि मेघनीनगर परिसरातील 29 जणांचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर चित्रपट निर्माते महेश कलावाडिया बेपत्ता असल्याची माहिती आहे. अखेरचा त्यांचा फोन अपघातस्थळापासून फक्त 700 मीटर अंतरावर अॅक्टिव्ह होता.विमान अपघातानंतर त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. ते देखील अपघातात बळी पडले की काय अशी शंका उपस्थित होत आहे. पुष्टी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने डीएनए नमुने देखील सादर केले आहेत.

महेश कलावडिया, ज्यांना महेश जिरावाला म्हणूनही ओळखले जाते, ते एक संगीत अल्बम दिग्दर्शक आहेत. नरोडा परिसरातील रहिवासी आहेत. त्यांची पत्नी हेतल यांनी सांगितले की, गुरुवारी ते लॉ गार्डन परिसरात कोणालातरी भेटायला गेले होते. दुपारी 1.14 वाजता त्यांनी फोन करून सांगितले की बैठक संपली आहे आणि ते घरी परतत आहेत.

(ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?)

महेश यांच्या पत्नीने सांगितले की, "जेव्हा ते घरी परतले नाही, तेव्हा आम्ही त्यांना अनेकदा फोन केला पण त्याचा फोन बंद होता. पोलिसांना कळवल्यानंतर, जेव्हा मोबाईल लोकेशन ट्रेस केले तेव्हा ते विमान अपघात स्थळापासून फक्त 700 मीटर अंतरावर असल्याचे आढळून आले."

"त्याचा फोन पहाटे 1.40 वाजता बंद झाला. त्याच वेळी एअर इंडियाच्या विमानाने एआय-171 ने उड्डाण केले आणि काही क्षणातच तो क्रॅश झाले. त्यांची स्कूटर आणि फोन दोन्ही गायब आहेत आणि हे सर्व असामान्य आहे. कारण ते सहसा या मार्गाने घरी येत नाही", असंही त्यांच्या पत्नी सांगितलं.

(ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी)

गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान एआय-171 मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात विमानातील 242 जणांपैकी 241 जणांचा आणि मेघनीनगर परिसरातील 29 जणांचा मृत्यू झाला.अनेक मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले होते, त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जात आहे. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत डीएनए मॅचिंगद्वारे 47 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे आणि 24 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

Advertisement