
- भारत ने संयुक्त राष्ट्र की 80वीं वर्षगांठ पर वैश्विक शांति और बहुपक्षीय सहयोग पर अपना सशक्त रुख प्रस्तुत किया.
- UN में भारतीय राजदूत पर्वतनेनी हरीश ने शीत युद्ध के बाद बढ़े गैर-राज्य आतंकी संगठनों की भूमिका पर भी बात रखी.
- भारत ने आतंकवाद के खिलाफ जीरो टोलरेंस नीति और संयुक्त राष्ट्र में शांति मिशनों में अपनी प्रतिबद्धता दोहराई.
संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताने जागतिक शांतता, बहुपक्षीय सहकार्य आणि दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका मांडली. भारताने पुन्हा एकदा दहशतवादाबाबत पाकिस्तानला फटकारले आहे. शीतयुद्धानंतर संघर्षांचे स्वरूप कसे बदलले आणि दहशतवादी संघटनांची भूमिका कशी वाढली हे संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.
अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत, ज्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या अचूक कारवाईची देखील यावेळी माहिती दिली.
#IndiaAtUN
— India at UN, NY (@IndiaUNNewYork) July 22, 2025
PR @AmbHarishP delivered 🇮🇳's statement at the @UN Security Council High Level Open Debate on Promoting International Peace and Security through Multilateralism and Peaceful Settlement of Disputes. @MEAIndia @IndianDiplomacy pic.twitter.com/A3jp6ojkJy
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना भारताने म्हटले की, एकीकडे, भारत एक परिपक्व लोकशाही, एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान असा देश आहे जो अतिरेकीपणा आणि दहशतवादात बुडालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सतत कर्ज घेत आहे.
भारताने स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानी दहशतवादी शाळांवर हल्ला करून निष्पाप मुलांचे जीव घेतात आणि अफगाण सीमेवरील निर्वासित शिबिरांवर पाकिस्तानी सैन्य बॉम्ब हल्ला करते, ज्यात अनेक मुलांचा बळी जातो. अशा परिस्थितीत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. पी. हरीश यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
(नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?)
IMF कर्जावरून भारताची तीव्र आक्षेप
भारताने पाकिस्तानला नवीन आर्थिक पॅकेज देण्याच्या प्रस्तावावर तीव्र आक्षेप नोंदवला. भारताने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय निधीचा, विशेषतः IMF कडून मिळालेल्या कर्जाचा, सीमापार दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी दुरुपयोग करत असल्याचा गंभीर आरोप केला. भारताने जागतिक कर्ज देण्याच्या चौकटीत नैतिक विचारांचा समावेश करण्याची मागणी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world