
पाकिस्तानच्या कुरघोडी थांबवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादाची तळं उद्ध्वस्त करण्यात आली. पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर केलेल्या दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानला इशारा दिला. मात्र त्यानंतरही पाकिस्तानकडून कुरघोडी सुरूच आहे. काश्मिरातील दहशतवाद संपविण्यासाठी नागा साधू सामना करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी गरज पडली तर नागा साधू सामना करतील. देशातील हिंदू एकत्र आले तर पाकिस्तान संपून जाईल अस स्पष्ट मत उज्जैन महाकाल नगरीच्या नागा साधूंनी शिर्डीत साई दर्शनानंतर व्यक्त केली. उज्जैनची नागा साधूंची टोळी आज शिर्डीला साई बाबा दर्शनासाठी आली असताना त्यांनी साई बाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. भस्म परिधान केलेले नागा साधूंचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
नक्की वाचा - किती विमानं पडली? CDS यांच्या उत्तरावर वादळ, काँग्रेसनं केली 'ऑपरेशन सिंदूर'च्या चौकशीची मागणी
अलीकडे काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लावर बोलताना नागा साधूंनी तिखट प्रतिक्रिया दिली. सरकारने दहशतवादचा कायमचा बिमोड करावा तसेच गरज पडल्यास जुना आखाड्याला सूचना द्याव्यात. नागा साधू स्वतः दहशतवाद विरोधी लढण्यासाठी काश्मीरमध्ये जातील अस स्पष्ट मत नागा साधूंनी व्यक्त केलं आहे. 'हिंदू खतरे में' म्हटलं जात. मात्र हिंदू कधीच संकटात असू शकत नाही. जगामध्ये एकमेव सनातन हिंदू धर्मच राहील. सध्या कलियुग असून सतयुगाकडे वाटचाल असल्याच देखील सांगत ऑपरेशन सिंदूरमधील विंग कमांडर व्योमिका सिंह और कर्नल सोफिया कुरैशी यांच कौतुक केलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world