
दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा बळी गेला. महिलांच्या डोळ्यांदेखील त्यांच्या पतीला गोळ्या घालण्यात आल्या, त्याचं कुंकू पुसण्यात आलं. याचं प्रत्युत्तर भारताने 6-7 मेदरम्यान केलेल्या सिंदूर ऑपरेशनने दिलं आणि भारतीयांवर केलेल्या हल्ल्याचं तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल असा थेट संदेश देण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिंदूर ऑपरेशनमध्ये पीओकेमधील कित्येक दहशतवादी तळं नष्ट करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने अनेक स्वदेशी शस्त्रांचा वापर केला. ज्यामध्ये ब्रम्होस आणि एस 400 सारख्या मिसाइलचा समावेश होता. पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर देणाऱ्या या सिंदूर ऑपरेशनचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे.
नक्की वाचा - Pune News: वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या ते महिला सुरक्षा.. पुण्यातील नेत्यांचं विचारमंथन; कोण काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूरसाठी ज्या मिसाइल्सचा वापर करण्यात आला होत्या, त्यासाठी लागणाऱ्या चीपची निर्मिती पुण्यात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 28 जून रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या NDTV Marathi Emerging Business Conclave दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.
पुण्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सिंदूर ऑपरेशनमध्ये जी क्षेपणास्त्र वापरली गेली. त्यामधली जी चीप असते ती पुण्यामध्ये तयार करण्यात आली. पुण्यातला मोदक, मिसळ ते भाकरवाडी ते जगाला कोविडपासून सुरक्षित करणारी लस पुण्याने तयार केली आहे, त्याचा अभिमान आहे. आजही सैन्यातील मोठमोठे अधिकारी असो किंवा व्यवसाय करणारे उद्योजक असोत, शेवटी ते पुण्यामध्ये येऊन राहतात. पुण्यामधील वातावरण चांगलं आहे. हे सुरक्षित शहर वाटते. पुण्यामध्ये प्रचंड रोजगार निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये बाहेरुन येणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world