
(Pandharpur Wari) वारकरीचं काय अख्ख्या देशासाठी महत्त्वाची मानली जाणारी आषाढीची पालखी मार्गस्थ झाली आहे. येत्या ५ जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे.
अकोला (Akola News) जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे (Narayan Maharaj Tarale passes away) यांचं शनिवारी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होतेय. त्यांनी बाळापूर तालुक्यातल्या व्याळा गावी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतलीय. त्यांनी 60 वर्षे सलगपणे पंढरीची वारी केलीय.
नक्की वाचा - Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी कीर्तनातून वारकरी संप्रदायाची सेवा केलीय. त्यांचे वारकरी संप्रदायातील 'विरह अभंग' खूप प्रसिद्ध आहेय. आज सकाळी 10 वाजता त्यांच्यावर व्याळा या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराष्ट्रभरातून आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वारकरी मंडळी उपस्थित राहणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world