
शुभम बायस्कार, अमरावती: पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेण्याचा ओढा वाढत असल्याने राज्यातील झेडपी शाळांना घरघर लागल्याचे दिसत आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडत आहेत. याबाबतच एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली असून अमरावती जिल्हा परिषदेच्या आठ शाळांना कायमचे टाळे लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्हा परिषदेच्या आठ शाळांना कायमचे टाळे लागले आहे. गेल्या चार वर्षामध्ये 17 हजार 348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या वाढीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. याआधी पटसंख्या घटली म्हणून बुलढाण्यात शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली होती, त्यामुळे आता अमरावतीमध्येही बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी होत आहे.
( नक्की वाचा : Ghatkopar station : घाटकोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी लोकलखाली अडकला )
अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कशी घटली पटसंख्या?
वर्ष 2021- 22
शाळांची संख्या - 1580
विद्यार्थ्यांची संख्या - 1,16,669
वर्ष 2022- 23
शाळांची संख्या - 1576
विद्यार्थ्यांची संख्या - 1,10,049
घटलेली पटसंख्या - 6620
बंद पडलेल्या शाळा - 04
वर्ष 2023- 24
शाळांची संख्या - 1576
विद्यार्थ्यांची संख्या - 105382
घटलेली पटसंख्या - 4667
बंद पडलेल्या शाळा - 00
वर्ष 2024- 25
शाळांची संख्या - 1572
विद्यार्थ्यांची संख्या - 99322
घटलेली पटसंख्या - 6060
बंद पडलेल्या शाळा - 04
गेल्या चार वर्षात 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांना पाठ दाखवली तर आठ शाळा ह्या बंद पडल्या आहेत.
Jejuri Accident : जेजुरीजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world